शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आयसीटीमुळे मराठवाड्यात कुशल मनु्ष्यबळासह उद्योजक निर्माण होतील - मुख्यमंत्री फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:12 IST

मराठवाड्यात उद्योगासाठी लागणारे कुशल मनु्ष्यबळ घडविण्याबरोबरच आयसीटी उद्योजक घडवेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देरसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे जालना येथील सिरसवाडीत फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मराठवाड्यात आयसीटी ही संस्था कौशल्यपूर्ण आणि उद्योजक निर्माण करण्याचे काम भविष्यात करणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले

जालना : मराठवाड्यात उद्योगासाठी लागणारे कुशल मनु्ष्यबळ घडविण्याबरोबरच आयसीटी उद्योजक घडवेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे जालना येथील सिरसवाडीत फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले. सिरसवाडी येथील नियोजित जागेवर सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम पार पडला. कोनशिलेच्या अनावरणानंतर शहरातील हॉटेल गॅलेक्सी  येथील सभागृहात मुख्य कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याला प्रगतीपथावर घेऊन जायचे असेल तर, राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यासह मागास राहिलेल्या भागाचा विकास करणे महत्वाचे आहे. त्याशिवाय राज्याचा सर्वांगिण विकास होणार नाही. 

उद्योजक निर्माण होतील मराठवाडा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या ९० टक्के निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे. आयसीटी हा याचाच एक भाग आहे. उद्योगासाठी गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. कारण मनुष्यबळ हे या प्रक्रियेत चुंबकाचे काम करते. पुण्यात उत्तम मनुष्यबळ असल्याने तिथे उद्योग आले. मराठवाड्यात आयसीटी ही संस्था कौशल्यपूर्ण आणि उद्योजक निर्माण करण्याचे काम भविष्यात करणार आहे. त्याचबरोबर येथे उभारण्यात येत असलेल्या सीड्स पार्कलाही या संस्थेचा लाभ होणार आहे,  असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalanaजालनाState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर