शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

...अन उमेदवारांच्या हृदयाचे ठोके चुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:50 IST

भोकरदन, परतूर आणि बदनापूर विधानसभा मतदार संघात अत्यंत सरळ पध्दतीने उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. तर जालना, घनसावंगी मतदार संघात मात्र रात्री ९ वाजेपर्यंत आक्षेपांबाबत निर्णय लांबल्याने उमेदवारांच्या ह्रदयाचे ठोके चुकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील भोकरदन, परतूर आणि बदनापूर विधानसभा मतदार संघात अत्यंत सरळ पध्दतीने उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. तर जालना, घनसावंगी मतदार संघात मात्र रात्री ९ वाजेपर्यंत आक्षेपांबाबत निर्णय लांबल्याने उमेदवारांच्या ह्रदयाचे ठोके चुकले होते.विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. कोण कोणत्या उमेदवाराविरूध्द कुठला आक्षेप घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यामुळे सकाळपासूनच तहसील कार्यालयामध्ये उमेदवार तसेच उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. परतूर, बदनापूर तसेच भोकरदन मतदार संघात फारसे आक्षेप न आल्याने तेथील प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. तर जालना आणि घनसावंगी मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहेत. त्यातच जालन्यातील राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे कैलास फुलारी यांनी रामनगर साखर कारखान्यासंदर्भात गंभीर आक्षेप दाखल केल्याने मोठी खळबळउडाली होती. यामध्ये ज्यावेळी खोतकर यांनी त्यांच्या अन्य भागीदारांसोबत हा सहकारी साखर कारखाना खरेदी केल्यानंतर त्यावेळी शेतकऱ्यांसह कामगारांचे देणे, त्या कारखान्याची असलेली शासकीय जमीन अधिग्रहण करण्याचा मुद्दा आक्षेपात नोंदविण्यात आला होता.परंतु, या आक्षेपासंदर्भात खोतकर यांनी काही महिन्यांपूर्वी या उद्योगाच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केली. शिक्षणासंदर्भातील माहिती याबद्दलही फुलारी यांनी आक्षेप घेतला होता. परंतु, तोही आक्षेप फेटाळण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आमदार निवासासंदर्भात तक्रार केली होती. परंतु, हा मुद्दाही फेटाळण्यात आला. एमआयएमचे उमेदवार इकबाल पाशा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन पत्नींची माहिती त्यात नमूद केली नसल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतला होता. तो ही आक्षेप निकाली काढण्यात आला. अपक्ष उमेदवार अब्दूल रशीद पहैलवान यांच्या विरोधातही आक्षेप दाखल होता, तो फेटाळला आहे.सोमवारी चित्र होणार स्पष्टउमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ आॅक्टोबर ही आहे. या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात नेमके किती उमेदवार रिंगणात राहतील, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना