शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

वानडगाव येथे साडेसात हजार कामगंध सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:45 IST

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.अशा प्रकारचा कामगंध सापळे बसविण्याचा हा राज्यातील कदाचित पहिलाच प्रयोग असावा, असे सांगण्यात आले. वानडगाव येथे लागवडीखालील क्षेत्र जवळपास १८ हजार एकर आहे. त्यापैकी ७५० एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी शेंदरी बोेंडअळीमुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा अधिक घटले होते. यावर प्रभावी उपाय म्हणून कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी देखील विशेष उपाययोजना सुचविल्या होत्या.गुजरातमधून आलेल्या शेंदरी बोंडअळीने संपूर्ण महाराष्ट्रात हल्लाबोल केला होता. त्यातून सावरण्यासाठी शेतक-यांनी त्यावेळी कपाशीची लागवड लवकर करून त्याची वेचणी देखील गतीने करण्यात आली. राहिलेल्या प-हाट्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्या जाळून टाकण्यात आल्या होत्या. एवढ्यावरही बोंडअळीने २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले होते. शेंदरी बोंडअळीचा आकार तांदळाच्या दाण्याऐवढा असल्याने तिचा हल्ला झाल्यावर प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. परंतु ज्यावेळी उगवलेल्या कपाशीच्या पानांवर छिद्र पडतात. त्यावेळी या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. सामूहिक उपाययोजने अंतर्गत कामगंध सापळे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अजय मिटकरी तसेच वानडगाव येथील प्रवीण एखुंडे, पांडुरंग जºहाड, सुजीत जोगस, सतीश प्रधान, सचिन कोल्हे, सुखदेव नरवडे, तुषार थिटे, कोमल घारे यांची उपस्थिती होती. या सामूहिक उपाययोजनेतून नेमका किती फरक पडतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.शेंदरी बोंडअळी : राज्यातील पहिला सामूहिक प्रतिबंधक प्रयोगसध्या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे मक्याचे पीक धोक्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी असाच हल्ला शेंदरी बोंडअळीने कपाशी पिकावर केला होता. त्यातून शेतक-याचे मोठे नुकसान झाले होते. कपाशीवर पडलेल्या या बोंडअळीमुळे कपाशीचा दर्जाही घसरला होता.याचा परिणाम म्हणून शेतक-यांना कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नव्हता. ही बाब कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, मुख्य समन्वयक एस.व्ही. सोनवणे यांनी गांभिर्याने घेतल्याची माहिती शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी दिली. वानडगावमध्ये आज सर्वत्र उत्साही वातावरण होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रscienceविज्ञानFarmerशेतकरी