शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

वानडगाव येथे साडेसात हजार कामगंध सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:45 IST

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.अशा प्रकारचा कामगंध सापळे बसविण्याचा हा राज्यातील कदाचित पहिलाच प्रयोग असावा, असे सांगण्यात आले. वानडगाव येथे लागवडीखालील क्षेत्र जवळपास १८ हजार एकर आहे. त्यापैकी ७५० एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी शेंदरी बोेंडअळीमुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा अधिक घटले होते. यावर प्रभावी उपाय म्हणून कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी देखील विशेष उपाययोजना सुचविल्या होत्या.गुजरातमधून आलेल्या शेंदरी बोंडअळीने संपूर्ण महाराष्ट्रात हल्लाबोल केला होता. त्यातून सावरण्यासाठी शेतक-यांनी त्यावेळी कपाशीची लागवड लवकर करून त्याची वेचणी देखील गतीने करण्यात आली. राहिलेल्या प-हाट्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्या जाळून टाकण्यात आल्या होत्या. एवढ्यावरही बोंडअळीने २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले होते. शेंदरी बोंडअळीचा आकार तांदळाच्या दाण्याऐवढा असल्याने तिचा हल्ला झाल्यावर प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. परंतु ज्यावेळी उगवलेल्या कपाशीच्या पानांवर छिद्र पडतात. त्यावेळी या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. सामूहिक उपाययोजने अंतर्गत कामगंध सापळे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अजय मिटकरी तसेच वानडगाव येथील प्रवीण एखुंडे, पांडुरंग जºहाड, सुजीत जोगस, सतीश प्रधान, सचिन कोल्हे, सुखदेव नरवडे, तुषार थिटे, कोमल घारे यांची उपस्थिती होती. या सामूहिक उपाययोजनेतून नेमका किती फरक पडतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.शेंदरी बोंडअळी : राज्यातील पहिला सामूहिक प्रतिबंधक प्रयोगसध्या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे मक्याचे पीक धोक्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी असाच हल्ला शेंदरी बोंडअळीने कपाशी पिकावर केला होता. त्यातून शेतक-याचे मोठे नुकसान झाले होते. कपाशीवर पडलेल्या या बोंडअळीमुळे कपाशीचा दर्जाही घसरला होता.याचा परिणाम म्हणून शेतक-यांना कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नव्हता. ही बाब कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, मुख्य समन्वयक एस.व्ही. सोनवणे यांनी गांभिर्याने घेतल्याची माहिती शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी दिली. वानडगावमध्ये आज सर्वत्र उत्साही वातावरण होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रscienceविज्ञानFarmerशेतकरी