शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वानडगाव येथे साडेसात हजार कामगंध सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:45 IST

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.अशा प्रकारचा कामगंध सापळे बसविण्याचा हा राज्यातील कदाचित पहिलाच प्रयोग असावा, असे सांगण्यात आले. वानडगाव येथे लागवडीखालील क्षेत्र जवळपास १८ हजार एकर आहे. त्यापैकी ७५० एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी शेंदरी बोेंडअळीमुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा अधिक घटले होते. यावर प्रभावी उपाय म्हणून कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी देखील विशेष उपाययोजना सुचविल्या होत्या.गुजरातमधून आलेल्या शेंदरी बोंडअळीने संपूर्ण महाराष्ट्रात हल्लाबोल केला होता. त्यातून सावरण्यासाठी शेतक-यांनी त्यावेळी कपाशीची लागवड लवकर करून त्याची वेचणी देखील गतीने करण्यात आली. राहिलेल्या प-हाट्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्या जाळून टाकण्यात आल्या होत्या. एवढ्यावरही बोंडअळीने २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले होते. शेंदरी बोंडअळीचा आकार तांदळाच्या दाण्याऐवढा असल्याने तिचा हल्ला झाल्यावर प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. परंतु ज्यावेळी उगवलेल्या कपाशीच्या पानांवर छिद्र पडतात. त्यावेळी या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. सामूहिक उपाययोजने अंतर्गत कामगंध सापळे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अजय मिटकरी तसेच वानडगाव येथील प्रवीण एखुंडे, पांडुरंग जºहाड, सुजीत जोगस, सतीश प्रधान, सचिन कोल्हे, सुखदेव नरवडे, तुषार थिटे, कोमल घारे यांची उपस्थिती होती. या सामूहिक उपाययोजनेतून नेमका किती फरक पडतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.शेंदरी बोंडअळी : राज्यातील पहिला सामूहिक प्रतिबंधक प्रयोगसध्या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे मक्याचे पीक धोक्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी असाच हल्ला शेंदरी बोंडअळीने कपाशी पिकावर केला होता. त्यातून शेतक-याचे मोठे नुकसान झाले होते. कपाशीवर पडलेल्या या बोंडअळीमुळे कपाशीचा दर्जाही घसरला होता.याचा परिणाम म्हणून शेतक-यांना कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नव्हता. ही बाब कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, मुख्य समन्वयक एस.व्ही. सोनवणे यांनी गांभिर्याने घेतल्याची माहिती शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी दिली. वानडगावमध्ये आज सर्वत्र उत्साही वातावरण होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रscienceविज्ञानFarmerशेतकरी