शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

काळ्या आईच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोडल्या शंभर कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:27 IST

शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, गेल्या दीड वर्षात शेतक-यांचीच बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जवळपास शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्याचे दिसून आले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, गेल्या दीड वर्षात शेतक-यांचीच बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जवळपास शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्याचे दिसून आले आहे.भारत हा पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीचा एक, दोन एकरचा तुकडाही शेतक-यांसाठी लाखमोलाचा असतो. तो राबराब राबून त्या शेतीची मशागत करून, त्यात धान्यरूपी सोने पिकवतो. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती अडचणीत सापडली आहे. त्यातच शासनाच्या तुघलकी धोरणामुळे देखील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गेल्या दोन वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतक-यांनी विहीर खोदणे तसेच ठिबक सिंचनासह अन्य शेतीच्या कामासाठी कष्टातून जमवलेल्या ठेवी मोडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या दोन्ही बाबींसाठी अनुदान मिळत असताना शेतकºयांनी त्यांच्या ठेवी का मोडल्या, हा चिंतनाचा विषय आहे.या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेत संपर्क साधला असता ठेवी काढणा-या शेतक-यांच्या अर्जाची बँकेने छाननी केली असता, ठेवलेल्या ठेवी या शेतीच्या विविध कामांसाठी मोडत असल्याचे नमूद केले आहे. अचानक एका वर्षात शंभर कोटी रूपयांच्या ठेवी कमी होणे हे बँकिंगसाठी किती धक्कादायक असते, हे नव्याने सांगणे नव्हे. या बँकेकडे गेल्यावर्षी एकूण ३८३ कोटी रूपयांच्या ठेवी होत्या. त्यात यंदा शंभर कोटी रूपयांची घट झाली आहे. या बॅकेत कुठल्याही अन्य संस्थांची खाते नसल्याने केवळ आणि केवळ शेतकºयांच्या या ठेवी असल्याचे सांगण्यात आले.नेत्यांची आश्वासने वाºयावरदीड वर्षापूर्वी या बँकेचे चेअरमन म्हणून मनोज मरकड यांची निवड झाली होती. त्यांच्या पदग्रहण समारंभास बँकेचे संचालक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच आ. राजेश टोपे यांनी आमच्या वेगेवगळ्या संस्थां, कारखान्यांच्या ठेवी आम्ही या बँकेत ठेवू असे आश्वासन दिले होते. मात्र ते कोणीच पाळले नसल्याचे वास्तव आहे.१०६ कोटींचा पीकविमाजिल्हा मध्यवर्ती बँकेने पीकविम्या पोटी १८ कोटी १० लाख रूपयांचा विम्याचा प्रिमियम भरला होता. त्या तुलनेत बँकेला १०६ कोटी रूपये मिळाले आहेत. जे की त्यांनी जवळपास ४ लाख ३६ हजार शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहेत. हा पीकविमा कोणत्या पिकांसाठी किती आला आहे, याचा तपशील विमा कंपनीने न दिल्याने संभ्रम कायम आहे. त्यातच हवामानावर आधारित फळ पीकविमा जिल्ह्यातील १९५२ शेतक-यांना मंजूर झाला असून, त्यापोटी आठ कोटी ७३ लाख रूपये मिळाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र