शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या आईच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोडल्या शंभर कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:27 IST

शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, गेल्या दीड वर्षात शेतक-यांचीच बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जवळपास शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्याचे दिसून आले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, गेल्या दीड वर्षात शेतक-यांचीच बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जवळपास शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्याचे दिसून आले आहे.भारत हा पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीचा एक, दोन एकरचा तुकडाही शेतक-यांसाठी लाखमोलाचा असतो. तो राबराब राबून त्या शेतीची मशागत करून, त्यात धान्यरूपी सोने पिकवतो. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती अडचणीत सापडली आहे. त्यातच शासनाच्या तुघलकी धोरणामुळे देखील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गेल्या दोन वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतक-यांनी विहीर खोदणे तसेच ठिबक सिंचनासह अन्य शेतीच्या कामासाठी कष्टातून जमवलेल्या ठेवी मोडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या दोन्ही बाबींसाठी अनुदान मिळत असताना शेतकºयांनी त्यांच्या ठेवी का मोडल्या, हा चिंतनाचा विषय आहे.या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेत संपर्क साधला असता ठेवी काढणा-या शेतक-यांच्या अर्जाची बँकेने छाननी केली असता, ठेवलेल्या ठेवी या शेतीच्या विविध कामांसाठी मोडत असल्याचे नमूद केले आहे. अचानक एका वर्षात शंभर कोटी रूपयांच्या ठेवी कमी होणे हे बँकिंगसाठी किती धक्कादायक असते, हे नव्याने सांगणे नव्हे. या बँकेकडे गेल्यावर्षी एकूण ३८३ कोटी रूपयांच्या ठेवी होत्या. त्यात यंदा शंभर कोटी रूपयांची घट झाली आहे. या बॅकेत कुठल्याही अन्य संस्थांची खाते नसल्याने केवळ आणि केवळ शेतकºयांच्या या ठेवी असल्याचे सांगण्यात आले.नेत्यांची आश्वासने वाºयावरदीड वर्षापूर्वी या बँकेचे चेअरमन म्हणून मनोज मरकड यांची निवड झाली होती. त्यांच्या पदग्रहण समारंभास बँकेचे संचालक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच आ. राजेश टोपे यांनी आमच्या वेगेवगळ्या संस्थां, कारखान्यांच्या ठेवी आम्ही या बँकेत ठेवू असे आश्वासन दिले होते. मात्र ते कोणीच पाळले नसल्याचे वास्तव आहे.१०६ कोटींचा पीकविमाजिल्हा मध्यवर्ती बँकेने पीकविम्या पोटी १८ कोटी १० लाख रूपयांचा विम्याचा प्रिमियम भरला होता. त्या तुलनेत बँकेला १०६ कोटी रूपये मिळाले आहेत. जे की त्यांनी जवळपास ४ लाख ३६ हजार शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहेत. हा पीकविमा कोणत्या पिकांसाठी किती आला आहे, याचा तपशील विमा कंपनीने न दिल्याने संभ्रम कायम आहे. त्यातच हवामानावर आधारित फळ पीकविमा जिल्ह्यातील १९५२ शेतक-यांना मंजूर झाला असून, त्यापोटी आठ कोटी ७३ लाख रूपये मिळाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र