शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची अवकृपा ! कृषी पंढरी कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांना बसला ५० कोटींचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 19:33 IST

The humiliation of nature गेल्या हंगामात जवळपास ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

ठळक मुद्देदीड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या कडवंचीत दोन हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत.शासनाने पाठीशी उभे राहावे व पुरेशी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

जालना : द्राक्ष उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्यातील कडवंची परिसरात द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. परतीचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले असून, ५० कोटींचा फटका बसला आहे. मात्र, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी बळ देईल, या आशेवर द्राक्ष उत्पादक या संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी उभा राहतो आहे. शासनाकडून मदत मिळाली, ती अत्यंत तोकडी आहे. शासनाने पाठीशी उभे राहावे व पुरेशी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

३० वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी एकत्र येत कृषी विज्ञान केंद्र आणि जर्मन पाणलोट क्षेत्र विकास संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. माती नालाबांध, बांधबंदिस्ती नदीवर लहान- लहान बंधारे बांधून जमितीत पाणीपातळी वाढविली. त्यानंतर येथे द्राक्ष लागवड करून येथील शेतकऱ्यांनी परिश्रमातून कृषी क्रांती घडवून आणली. दीड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या कडवंचीत दोन हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत.

गेल्या पंधरा वर्षांत येथील शेतकऱ्यांनी शेती हेच आपले घर मानले, अनेक जण शेतातच वास्तव्याला आहेत. सोनाका, माणिक चमन या जातींची द्राक्षे घेतली जातात. आता उन्हाळा जवळ आला असून, द्राक्ष बागांचा हंगाम तेजीत आहे. यंदा जबलपूर, चिखली तसेच अन्य गावांमधून बागा खरेदी करणाऱ्यारांनी द्राक्ष बागांची खरेदी सुरू केली आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात मोठी घट आली आहे.

गेल्यावर्षी ७२ कोटींची उलाढालगेल्यावर्षी चांगले वातावरण राहिल्याने द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या श्रमाचे फळ मिळाले होते. गेल्या हंगामात जवळपास ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ती यंदा केवळ दहा ते १२ कोटींवर येऊन ठेपली आहे. यामुळे यंदा शेतीत केलेला खर्च निघणेही अवघड झाले आहे.

मदतीची अपेक्षाअतिवृष्टी तसेच परतीचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून मदत मिळाली; परंतु ही मिळालेली मदत अत्यंत कमी आहे. मदत आणखी वाढवून मिळावी, अशी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. एवढे होऊनही शेतकरी हिंमत हरला नाही, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी असते. त्यावेळी तरी चांगले उत्पादन येईल, अशी आशा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीenvironmentपर्यावरण