शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

निसर्गाची अवकृपा ! कृषी पंढरी कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांना बसला ५० कोटींचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 19:33 IST

The humiliation of nature गेल्या हंगामात जवळपास ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

ठळक मुद्देदीड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या कडवंचीत दोन हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत.शासनाने पाठीशी उभे राहावे व पुरेशी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

जालना : द्राक्ष उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्यातील कडवंची परिसरात द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. परतीचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले असून, ५० कोटींचा फटका बसला आहे. मात्र, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी बळ देईल, या आशेवर द्राक्ष उत्पादक या संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी उभा राहतो आहे. शासनाकडून मदत मिळाली, ती अत्यंत तोकडी आहे. शासनाने पाठीशी उभे राहावे व पुरेशी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

३० वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी एकत्र येत कृषी विज्ञान केंद्र आणि जर्मन पाणलोट क्षेत्र विकास संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. माती नालाबांध, बांधबंदिस्ती नदीवर लहान- लहान बंधारे बांधून जमितीत पाणीपातळी वाढविली. त्यानंतर येथे द्राक्ष लागवड करून येथील शेतकऱ्यांनी परिश्रमातून कृषी क्रांती घडवून आणली. दीड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या कडवंचीत दोन हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत.

गेल्या पंधरा वर्षांत येथील शेतकऱ्यांनी शेती हेच आपले घर मानले, अनेक जण शेतातच वास्तव्याला आहेत. सोनाका, माणिक चमन या जातींची द्राक्षे घेतली जातात. आता उन्हाळा जवळ आला असून, द्राक्ष बागांचा हंगाम तेजीत आहे. यंदा जबलपूर, चिखली तसेच अन्य गावांमधून बागा खरेदी करणाऱ्यारांनी द्राक्ष बागांची खरेदी सुरू केली आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात मोठी घट आली आहे.

गेल्यावर्षी ७२ कोटींची उलाढालगेल्यावर्षी चांगले वातावरण राहिल्याने द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या श्रमाचे फळ मिळाले होते. गेल्या हंगामात जवळपास ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ती यंदा केवळ दहा ते १२ कोटींवर येऊन ठेपली आहे. यामुळे यंदा शेतीत केलेला खर्च निघणेही अवघड झाले आहे.

मदतीची अपेक्षाअतिवृष्टी तसेच परतीचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून मदत मिळाली; परंतु ही मिळालेली मदत अत्यंत कमी आहे. मदत आणखी वाढवून मिळावी, अशी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. एवढे होऊनही शेतकरी हिंमत हरला नाही, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी असते. त्यावेळी तरी चांगले उत्पादन येईल, अशी आशा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीenvironmentपर्यावरण