शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

निसर्गाची अवकृपा ! कृषी पंढरी कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांना बसला ५० कोटींचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 19:33 IST

The humiliation of nature गेल्या हंगामात जवळपास ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

ठळक मुद्देदीड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या कडवंचीत दोन हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत.शासनाने पाठीशी उभे राहावे व पुरेशी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

जालना : द्राक्ष उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्यातील कडवंची परिसरात द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. परतीचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले असून, ५० कोटींचा फटका बसला आहे. मात्र, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी बळ देईल, या आशेवर द्राक्ष उत्पादक या संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी उभा राहतो आहे. शासनाकडून मदत मिळाली, ती अत्यंत तोकडी आहे. शासनाने पाठीशी उभे राहावे व पुरेशी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

३० वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी एकत्र येत कृषी विज्ञान केंद्र आणि जर्मन पाणलोट क्षेत्र विकास संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. माती नालाबांध, बांधबंदिस्ती नदीवर लहान- लहान बंधारे बांधून जमितीत पाणीपातळी वाढविली. त्यानंतर येथे द्राक्ष लागवड करून येथील शेतकऱ्यांनी परिश्रमातून कृषी क्रांती घडवून आणली. दीड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या कडवंचीत दोन हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत.

गेल्या पंधरा वर्षांत येथील शेतकऱ्यांनी शेती हेच आपले घर मानले, अनेक जण शेतातच वास्तव्याला आहेत. सोनाका, माणिक चमन या जातींची द्राक्षे घेतली जातात. आता उन्हाळा जवळ आला असून, द्राक्ष बागांचा हंगाम तेजीत आहे. यंदा जबलपूर, चिखली तसेच अन्य गावांमधून बागा खरेदी करणाऱ्यारांनी द्राक्ष बागांची खरेदी सुरू केली आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात मोठी घट आली आहे.

गेल्यावर्षी ७२ कोटींची उलाढालगेल्यावर्षी चांगले वातावरण राहिल्याने द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या श्रमाचे फळ मिळाले होते. गेल्या हंगामात जवळपास ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ती यंदा केवळ दहा ते १२ कोटींवर येऊन ठेपली आहे. यामुळे यंदा शेतीत केलेला खर्च निघणेही अवघड झाले आहे.

मदतीची अपेक्षाअतिवृष्टी तसेच परतीचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून मदत मिळाली; परंतु ही मिळालेली मदत अत्यंत कमी आहे. मदत आणखी वाढवून मिळावी, अशी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. एवढे होऊनही शेतकरी हिंमत हरला नाही, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी असते. त्यावेळी तरी चांगले उत्पादन येईल, अशी आशा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीenvironmentपर्यावरण