शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

HSC Result: बारावीतील मुलीच हुश्शार, जालना जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के

By विजय मुंडे  | Updated: May 25, 2023 20:46 IST

टक्का घसरला : ९३ टक्के मुली तर ९० टक्के मुलं उत्तीर्ण

जालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा गुरूवारी निकाल जाहीर झाला. गतवर्षी ९३.९८ टक्क्यांवर असलेला निकाल यंदा घसरला असून, ९१.८८ टक्क्यांवर आला आहे. या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, ९३.८९ टक्के मुली तर ९०.५७ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह शिक्षण विभाग व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार कॉपी करणाऱ्या परीक्षार्थींविरूद्ध कारवाईही करण्यात आली होती. जिल्ह्यातील ३० हजार ६९३ परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात १८ हजार ५९० मुलं व १२ हजार १०३ मुलींचा समावेश होता. त्यातील २८ हजार २०२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ११ हजार ३६४ मुली तर १६ हजार ८३८ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण सरासरी निकाल हा ९१.८८ टक्के लागला आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.९८ टक्के लागला होता. या निकालात दोन टक्क्यांनी घट झाली आहे. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होताच परीक्षार्थींनी जल्लोष केला तसेच महाविद्यालयांच्या वतीनेही ठिकठिकाणी गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

४४ कॉपीबहाद्दरांवर झाली होती कारवाईबारावीच्या परीक्षेेत जिल्ह्यातील ४४ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली हाेती तर जालना जिल्ह्यात परीक्षेत्तर गैरमार्गाचे २३० प्रकरणे आढळून आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

३६ टक्के रिपिटरही उत्तीर्णफेब्रुवारी- मार्चमध्ये गतवर्षी बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ६११ रिपिटर परीक्षार्थींनीही परीक्षा दिली होती. त्यातील २२५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ३६.८२ टक्के आहे. त्यात १६१ मुलं आणि ६४ मुलीही उत्तीर्ण झाल्या आहेत.

गत सहा वर्षांतील निकालवर्ष निकालाची टक्केवारीफेब्रुवारी-मार्च २०१८- ८९.९०फेब्रुवारी-मार्च २०१९- ८७.१२फेब्रुवारी-मार्च २०२०- ९०.७२फेब्रुवारी-मार्च २०२१- ९८.९७फेब्रुवारी-मार्च २०२२- ९३.९८फेब्रुवारी-मार्च २०२३- ९१.८८

असा आहे तालुक्यांचा निकलातालुका टक्केवारीजालना- ८८.५४बदनापूर- ९३.१५अंबड- ९१.७६परतूर- ८५.३६घनसावंगी- ९०.३२मंठा- ८९.९८भोकरदन- ९५.७९जाफराबाद- ९३.०८

टॅग्स :JalanaजालनाHSC Exam Resultबारावी निकाल