शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

परतुरात रेल्वेगेटवर वाहने खोळंबल्याने गोंधळ, रेल्वेही सिग्नलबाहेर रखडली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:46 IST

आष्टी रेल्वे गेट मध्येच वाहने खोळंबल्याने स्थानकात येणारी मनमाड ते काचीगुडा पॅसेजर गाडीला रेल्वेलाही सिग्नलच्या बाहेरच ‘हॉर्न’ वाजवत उभे राहावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आष्टी रेल्वे गेट मध्येच वाहने खोळंबल्याने स्थानकात येणारी मनमाड ते काचीगुडा पॅसेजर गाडीला रेल्वेलाही सिग्नलच्या बाहेरच ‘हॉर्न’ वाजवत उभे राहावे लागले. या ठिकाणी पोलिसही नसल्याने अधिकच गोंधळ उडाला होता.परतूर आष्टी रस्त्यावरील रेल्वे गेट वर उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचे काहीच केलेले नाही. संबंधित गुत्तेदाराने ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारा औरंगाबादकडून येणाऱ्या मनमाड ते काचीगुडा पॅसेंजर रेल्वेगाडीमुळे रेल्वे फाटक लागले. यामुळे चारही बाजूने वाहने खोळंबली. ही वाहने काढण्यात बराच विलंब झाला. यातच पुन्हा दुसरी पॅसेंजर गाडी औरंगाबाद वरुन आली. मात्र ही खोळंबलेली वाहने रेल्वेगेट मध्येच खोळंबली. यामुळे रेल्वे गेटही लावता येईना, रेल्वे मात्र सिग्नलच्या बाहेर येऊन उभी राहिली. ही रेल्वे अर्धा तास ‘हॉर्न’ वाजवत उभी राहिली. इकडेही वाहतुकीचा गोंधळ वाढतच गेला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबल्यानंतरही या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहना करावा लागला. रेल्वे सिग्नलच्या बाहेर रखडली व रेल्वे गेटमध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहने खोळंबली. नंतर गेटमनने त्याचेही हॉर्न सारखे वाजवत मध्येच गेट बंद केले व रेल्वेला मार्ग मोकळा करून दिला. अशी कोंडी दिवसातून दोन ते तीन वेळा हात आहे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गुत्तेदाराचे दुर्लक्ष, कामावर अभियंता नाहीया रेल्वे गेटवर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. चारही बाजूने खोदकाम करण्यात आले आहे. मात्र वाहतुकीचा कुठलाच विचार करण्यात आला नाही. आष्टीकडे जाणारा रस्ता एकेरी झाल्याने वाहने खोळंबत आहेत. ठेकेदाराने पर्यायी रस्ता किंवा दोन्ही बाजूंनी रस्ता सुरू न ठेवल्याने या रेल्वे गेटवर गोंधळ उडत आहे.कामावर जबाबदार अभियंताही नाही व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसही नाहीत. यामुळे मोठा गोंधळ होत आहे. तरी मोठा अनर्थ घडण्याअगोदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून या ठिक ाणी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी