शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती

By विजय मुंडे  | Updated: February 10, 2024 17:54 IST

असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली.

जालना : साल्हेर किल्ल्यावरून दर्शन घेताना पाेलिस गडबड करीत होते. त्यामुळे खाली काही तरी गडबड असल्याचा संशय आला. खाली येताना अचानक टेम्पो वाहनांवर आला. त्यावेळी एकजण ओरडल्याने लोकं बाजूला झाली आणि दुर्घटना टळली. त्याला पोलिसांनी धरले. त्याने कोणाचेतरी नाव घेतले मला पिकअप घालायला सांगितल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना सांगितले आहे. असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून अंतरवाली येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरूस्ती करून सग्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, शिंदे समितीचे काम युद्धपातळीवर वाढवावे, एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा पारित करावा आदी मागण्यांसाठी आपण हे आमरण उपोषण सुरू केले आहे, असे जरांगे म्हणाले.

त्यांनीच पत्र द्यायला सांगितले असेलमंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्याबाबत विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, त्यांना कोणी धमकी देणार नाही. त्यांनीच कोणाला तरी पत्र द्यायला सांगितले असेल. त्यांच्या नेत्यांनी त्याला बळ दिल्यामुळे माझ्या जातीला त्रास होतोय. त्याला थांबविण्याचा विचार करा. जे आडमुठे आहेत, जे कोयत्याची भाषा करतात, जातींमध्ये भांडणे लावतात त्यांना पोलिसांचे संरक्षण आहे, त्यांच्यासाठी सरकार असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

तर मंडल आयोगाला चॅलेंज करणारत्यांनी गोरगरिब ओबीसींसाठी भूमिका बदलावी. पडद्याच्या मागे राहून लेकरांचे वाटुळे केले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार. गोरगरिबांचे वाटोळे करण्याची नियत नाही. परंतु, लेकरांचे मुडदे पडायला लागले तर आपल्याला मंडल आयोगाला चॅलेंज करावे लागणार असल्याचा पुर्नरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला.

गृहविभागाचे नवीन नियमजे शांततेचे आवाहन करतात, कायद्याची मागणी प्रमाणिकपणे करते त्यासाठी सरकार नाही. जे आडमुठी मागणी करेल, जातीत तेढ निर्माण करेल, ओबीसी- मराठ्यात वाद लावतात त्यांच्यासाठी सरकार आहे. गृहविभागाचे नवीन नियम आलेत गुन्हे कोणाचे मागे घ्यायचे त्यांच्याकडे येणाऱ्यांचे, त्यांचे ऐकाऱ्यांचे, बाकीच्यांवर गुन्हे टाकायचे. घोटाळे करणाऱ्यांना सोबत घेवून फिरायचे असे नवीन नियम निघाल्याची टिकाही जरांगे पाटील यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना