शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती

By विजय मुंडे  | Updated: February 10, 2024 17:54 IST

असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली.

जालना : साल्हेर किल्ल्यावरून दर्शन घेताना पाेलिस गडबड करीत होते. त्यामुळे खाली काही तरी गडबड असल्याचा संशय आला. खाली येताना अचानक टेम्पो वाहनांवर आला. त्यावेळी एकजण ओरडल्याने लोकं बाजूला झाली आणि दुर्घटना टळली. त्याला पोलिसांनी धरले. त्याने कोणाचेतरी नाव घेतले मला पिकअप घालायला सांगितल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना सांगितले आहे. असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून अंतरवाली येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरूस्ती करून सग्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, शिंदे समितीचे काम युद्धपातळीवर वाढवावे, एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा पारित करावा आदी मागण्यांसाठी आपण हे आमरण उपोषण सुरू केले आहे, असे जरांगे म्हणाले.

त्यांनीच पत्र द्यायला सांगितले असेलमंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्याबाबत विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, त्यांना कोणी धमकी देणार नाही. त्यांनीच कोणाला तरी पत्र द्यायला सांगितले असेल. त्यांच्या नेत्यांनी त्याला बळ दिल्यामुळे माझ्या जातीला त्रास होतोय. त्याला थांबविण्याचा विचार करा. जे आडमुठे आहेत, जे कोयत्याची भाषा करतात, जातींमध्ये भांडणे लावतात त्यांना पोलिसांचे संरक्षण आहे, त्यांच्यासाठी सरकार असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

तर मंडल आयोगाला चॅलेंज करणारत्यांनी गोरगरिब ओबीसींसाठी भूमिका बदलावी. पडद्याच्या मागे राहून लेकरांचे वाटुळे केले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार. गोरगरिबांचे वाटोळे करण्याची नियत नाही. परंतु, लेकरांचे मुडदे पडायला लागले तर आपल्याला मंडल आयोगाला चॅलेंज करावे लागणार असल्याचा पुर्नरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला.

गृहविभागाचे नवीन नियमजे शांततेचे आवाहन करतात, कायद्याची मागणी प्रमाणिकपणे करते त्यासाठी सरकार नाही. जे आडमुठी मागणी करेल, जातीत तेढ निर्माण करेल, ओबीसी- मराठ्यात वाद लावतात त्यांच्यासाठी सरकार आहे. गृहविभागाचे नवीन नियम आलेत गुन्हे कोणाचे मागे घ्यायचे त्यांच्याकडे येणाऱ्यांचे, त्यांचे ऐकाऱ्यांचे, बाकीच्यांवर गुन्हे टाकायचे. घोटाळे करणाऱ्यांना सोबत घेवून फिरायचे असे नवीन नियम निघाल्याची टिकाही जरांगे पाटील यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना