शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भर दुष्काळात पीक विमा कंपनीचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:10 IST

शेतक-यांना फळपीक विमा मिळाला नाही अशा शेतक-यांकडून परत नव्याने फाईल जमा करणे सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : दुष्काळी भागात येणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र, विमा कंपनी शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून विमा संरक्षण न देता शेतक-यांना भूलथापा मारत आहे. ज्या शेतक-यांना फळपीक विमा मिळाला नाही अशा शेतक-यांकडून परत नव्याने फाईल जमा करणे सुरू केले आहे.भारत सरकार, महाराष्ट्र शासन व दी न्यू इंडिया एशोरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने फळपीक विमा योजना राबविली जात आहे. एका वर्षापूर्वीच शेतक-यांनी फळपीक विम्याची रक्कम आॅनलाइन विमा कंपनीकडे जमा केली आहे. असे असताना कंपनी शेतकºयांना विम्याची रक्कम न देता आता नव्याने भोकरदन येथे शिबीर घेण्यात आले. यात कागद पत्रांची पूर्तता करण्यास सांगून फळपीक उत्पादक शेतक-यांच्या फाईल जमा करून घेत आहे.विशेष म्हणजे जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांसाठी हे शिबीर जाफराबादला घ्यायला हवे होते. मात्र, तसे न होता येथील शेतक-यांना भोकरदनला बोलविण्यात आले. यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे विमा हप्ता भरतांना शेतक-यांनी आवश्यक त्या कागद पत्रांची पूर्तता केलेली आहे. मात्र, आता पुन्हा कंपनीचे अधिकारी मनमानी पध्दतीने सात बारा नोंदीसह तलाठी, गटअधिकारी, कृषी अधिकारी यांचा पेरणी अहवाल, लागवडीचे पत्र, रेखांश व अक्षांश तारीख व वेळेसहित फळबागचे छायाचित्र फाईल सोबत घेत आहे.एकीकडे दुष्काळाशी दोन हात करताना फळबागा जगविणे मुश्किल झाले आहे. अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने पाण्याचा प्रश्न कायम उभा आहे. भविष्यात बागा जगवायच्या कशा? यासह इतर अनेक प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहेत. त्यात आता प्रशासन आणि विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे फळबागा जोपासणाºया शेतकºयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतक-यांच्या नाकी नऊ येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकाºयांनी गतवर्षी भरलेल्या विमा हप्त्यानुसार अनुदान द्यावे, यासह इतर मागण्या शेतकरी वर्गातून केल्या जात आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBanking Sectorबँकिंग क्षेत्र