शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मंत्रिमंडळात जिल्हावासियांना टोपे, गोरंट्याल यांच्या रूपाने मंत्रीपदाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:59 IST

राष्ट्रवादीच्या कोट्यातून १२ वर्ष मंत्री राहिलेले आ. राजेश टोपे यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार काय, बद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार येणे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे नावही जाहीर झाले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी तीन पक्षांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर येणार आहे. त्यामुळे आता मंत्री मंडळात कोणाची वर्णी लागते, याबाबत जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. यात राष्ट्रवादीच्या कोट्यातून १२ वर्ष मंत्री राहिलेले आ. राजेश टोपे यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार काय, बद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. यापूर्वी युतीच्या काळात जालन्यात तीन मंत्री होते. त्यात आता केंद्रातील राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एकमेव मंत्री कार्यरत आहेत.जालना जिल्हा हा गेल्या काही वर्षात युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यात शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व होते. पूर्वी शिवसेनेचे तीन आमदार होते. परंतु आता चित्र बदलले आहे. आज भाजपचे तीन आमदार आहेत, तर शिवसेनचा एकही आमदार जालना जिल्ह्यात नसल्याचे वास्तव आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना या निवडणुकीत काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्यानी धोबीपछाड दिली. तसेच घनसावंगी मतदारसंघात डॉ. हिकमत उढाण यांनी मोठी खिंड लढवून टोपेंच्या नाकी नऊ आणले होते. परंतु नंतर तीन हजार २५० मतांनी टोपेंचाच विजय झाला.जालना जिल्ह्यात यापूर्वी भाजपचे बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रात राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही साडेचार वर्षे दानवेंकडेच असल्याने जालना हे राजकारणाचे मोठे शक्तीस्थान बनले होते. आज ही परिस्थिती बदलली आहे. आता युती ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते हे भाजप आणि शिवसेनेत जात असताना राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीवर निष्ठा कायम ठेवली. तर काँग्रेस पक्षाची सर्वत्र धूळधाण होत असताना जालन्यात मात्र, कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचा गड निष्ठा ठेवून कायम ठेवला.२०१६ मध्येही नगर पालिकेच्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी पालिका आपल्या ताब्यात ठेवून काँग्रेसचे अस्तित्व जालन्यात स्वत:च्या हिमतीवर कायम ठेवले. त्यामुळे अत्यंत अडचणीच्या काळात गोरंट्याल यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून विजय मिळविल्याने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गोरंट्याल यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वास दिले होते. ते आश्वासन पाळण्याची वेळ आता आली आहे.खोतकर, उढाणांचा पराभव जिव्हारीआज शिवसेनेचे नेते तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होत आहेत. मागील मंत्रिमंडळात खोतकर हे दुग्धविकास राज्यमंत्री होते. परंतु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. तर मातोश्रीच्या निकटवर्तियांमध्ये असलेले डॉ. हिकमत उढाण यांनीही चुरशीची लढत देत टोपे यांना शेवटपर्यंत झुंजवत ठेवले होते. परंतु जो जिता वही सिकंदर या म्हणीचा प्रत्यय येथे आला. यात टोपे यांनी बाजी मारली. खोतकर आणि उढाण यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी न लागल्यासच नवल.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारministerमंत्रीRajesh Topeराजेश टोपे