शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

मंत्रिमंडळात जिल्हावासियांना टोपे, गोरंट्याल यांच्या रूपाने मंत्रीपदाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:59 IST

राष्ट्रवादीच्या कोट्यातून १२ वर्ष मंत्री राहिलेले आ. राजेश टोपे यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार काय, बद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार येणे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे नावही जाहीर झाले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी तीन पक्षांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर येणार आहे. त्यामुळे आता मंत्री मंडळात कोणाची वर्णी लागते, याबाबत जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. यात राष्ट्रवादीच्या कोट्यातून १२ वर्ष मंत्री राहिलेले आ. राजेश टोपे यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार काय, बद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. यापूर्वी युतीच्या काळात जालन्यात तीन मंत्री होते. त्यात आता केंद्रातील राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एकमेव मंत्री कार्यरत आहेत.जालना जिल्हा हा गेल्या काही वर्षात युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यात शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व होते. पूर्वी शिवसेनेचे तीन आमदार होते. परंतु आता चित्र बदलले आहे. आज भाजपचे तीन आमदार आहेत, तर शिवसेनचा एकही आमदार जालना जिल्ह्यात नसल्याचे वास्तव आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना या निवडणुकीत काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्यानी धोबीपछाड दिली. तसेच घनसावंगी मतदारसंघात डॉ. हिकमत उढाण यांनी मोठी खिंड लढवून टोपेंच्या नाकी नऊ आणले होते. परंतु नंतर तीन हजार २५० मतांनी टोपेंचाच विजय झाला.जालना जिल्ह्यात यापूर्वी भाजपचे बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रात राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही साडेचार वर्षे दानवेंकडेच असल्याने जालना हे राजकारणाचे मोठे शक्तीस्थान बनले होते. आज ही परिस्थिती बदलली आहे. आता युती ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते हे भाजप आणि शिवसेनेत जात असताना राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीवर निष्ठा कायम ठेवली. तर काँग्रेस पक्षाची सर्वत्र धूळधाण होत असताना जालन्यात मात्र, कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचा गड निष्ठा ठेवून कायम ठेवला.२०१६ मध्येही नगर पालिकेच्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी पालिका आपल्या ताब्यात ठेवून काँग्रेसचे अस्तित्व जालन्यात स्वत:च्या हिमतीवर कायम ठेवले. त्यामुळे अत्यंत अडचणीच्या काळात गोरंट्याल यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून विजय मिळविल्याने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गोरंट्याल यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वास दिले होते. ते आश्वासन पाळण्याची वेळ आता आली आहे.खोतकर, उढाणांचा पराभव जिव्हारीआज शिवसेनेचे नेते तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होत आहेत. मागील मंत्रिमंडळात खोतकर हे दुग्धविकास राज्यमंत्री होते. परंतु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. तर मातोश्रीच्या निकटवर्तियांमध्ये असलेले डॉ. हिकमत उढाण यांनीही चुरशीची लढत देत टोपे यांना शेवटपर्यंत झुंजवत ठेवले होते. परंतु जो जिता वही सिकंदर या म्हणीचा प्रत्यय येथे आला. यात टोपे यांनी बाजी मारली. खोतकर आणि उढाण यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी न लागल्यासच नवल.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारministerमंत्रीRajesh Topeराजेश टोपे