शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडीकडून निराशा दूर होण्याची ‘आशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:49 IST

आशा कार्य करणाऱ्या महिला स्वयंसेविकांना मानधन तुलनेने अत्यल्प मिळत असून, त्यामुळे आर्थिक कुचंबणा होत आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्वांसाठी आरोग्य या मोहिमेंतर्गत तत्कालीन यूपीए सरकारने सात कलमी आरोग्य कार्यक्रम जाहीर केला होता. त्या अंतर्गत महाराष्ट्रात २००७- ०८ मध्ये या उपक्रमाची सुरूवात झाली होती. त्या अंतर्गत संपूर्ण राज्यभरात ६० हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. असे असले तरी या आशा कार्य करणाऱ्या महिला स्वयंसेविकांना मानधन तुलनेने अत्यल्प मिळत असून, त्यामुळे आर्थिक कुचंबणा होत आहे. आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून या स्वयंसेविकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासह मानधन वाढीची नवीन आशा निर्माण झाली आहे.राष्ट्रीय ग्रामीण अभियान २००५ अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या नागरिकांना परवडणारी आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांनी आदिवासी भागात काम करून त्यांचे आरोग्य कसे सुधारले याचा ‘सर्च’च्या माध्यमातून अभ्यास केला. त्यात गावातीलच सुशिक्षित युवती, महिला यांना प्रत्यक्षपणे आरोग्य सेवा देण्यासाठी सहभाग करून घेतल्यास त्याचा मोठा लाभ होऊ शकतो, जेणेकरून संबंधित महिलेला त्या परिसरातील बोली भाषा आणि उद्भवणाºया आजारांची ब-यापैकी माहिती असते आणि त्या भागातील नागरिकांचा तिच्यावर विश्वासही असतो. या अभ्यासातूनच २००७-०८ मध्ये महाराष्ट्रात ‘अ‍ॅक्रीडेटेड सोशल हेल्थ अ‍ॅक्टिविस्ट’ म्हणजेच आशा असे नामकरून करून ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात आली.यात प्रामुख्याने गरोदर माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, हा या पाठीमागील मुख्य उद्देश होता. त्यात आज घडीला अभ्यास केला असता या दोन्ही प्रकारामध्ये आशा स्वयंसेविकांनी लक्षणीय कार्य केल्याचे दिसून येते. एक हजार ५०० लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका अशा तत्वानुसार आशा वर्करची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्रात आजघडीला ६० हजार आशा स्वयंसेविका आहेत. परंतु, त्यांना मिळणारे मानधन आणि मोबदला हा अत्यंत अल्प आहे.मराठवाड्यात आठ हजार ‘आशा’मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये एकूण आठ हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. त्यात औरंगाबाद- १६६८, जालना- १४७१, परभणी- ९१६, हिंगोली- ९३६, लातूर- १६२३, नांदेड- १४२३, उस्मानाबाद- ११६१, बीड- १९०४ अशी संख्या आहे.आर्थिक स्तर उंचावणे गरजेचे‘आशा’ स्वयंसेविकांचा मुद्दा हेरून अंबड येथील गोदावरी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रमेश वाघमारे यांनी आपल्या पीएच.डी.चा विषय निवडला. त्यात त्यांनी सखोल संशोधन करून आशा स्वयंसेविकांची राज्यातील स्थिती जाणून घेतली. त्यानुसार अंगणवाडी ताईंसारखी त्यांची नेमणूक करून त्याच प्रमाणे त्यांना वाढीव मानधन देण्याचा शोध प्रबंध सादर केला. या प्रबंधातील तरतूदींकडे राज्य सरकारने लक्ष देण्याचे ठरविल्यास आपण त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत.

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिलाRajesh Topeराजेश टोपे