शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाविकास आघाडीकडून निराशा दूर होण्याची ‘आशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:49 IST

आशा कार्य करणाऱ्या महिला स्वयंसेविकांना मानधन तुलनेने अत्यल्प मिळत असून, त्यामुळे आर्थिक कुचंबणा होत आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्वांसाठी आरोग्य या मोहिमेंतर्गत तत्कालीन यूपीए सरकारने सात कलमी आरोग्य कार्यक्रम जाहीर केला होता. त्या अंतर्गत महाराष्ट्रात २००७- ०८ मध्ये या उपक्रमाची सुरूवात झाली होती. त्या अंतर्गत संपूर्ण राज्यभरात ६० हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. असे असले तरी या आशा कार्य करणाऱ्या महिला स्वयंसेविकांना मानधन तुलनेने अत्यल्प मिळत असून, त्यामुळे आर्थिक कुचंबणा होत आहे. आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून या स्वयंसेविकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासह मानधन वाढीची नवीन आशा निर्माण झाली आहे.राष्ट्रीय ग्रामीण अभियान २००५ अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या नागरिकांना परवडणारी आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांनी आदिवासी भागात काम करून त्यांचे आरोग्य कसे सुधारले याचा ‘सर्च’च्या माध्यमातून अभ्यास केला. त्यात गावातीलच सुशिक्षित युवती, महिला यांना प्रत्यक्षपणे आरोग्य सेवा देण्यासाठी सहभाग करून घेतल्यास त्याचा मोठा लाभ होऊ शकतो, जेणेकरून संबंधित महिलेला त्या परिसरातील बोली भाषा आणि उद्भवणाºया आजारांची ब-यापैकी माहिती असते आणि त्या भागातील नागरिकांचा तिच्यावर विश्वासही असतो. या अभ्यासातूनच २००७-०८ मध्ये महाराष्ट्रात ‘अ‍ॅक्रीडेटेड सोशल हेल्थ अ‍ॅक्टिविस्ट’ म्हणजेच आशा असे नामकरून करून ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात आली.यात प्रामुख्याने गरोदर माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, हा या पाठीमागील मुख्य उद्देश होता. त्यात आज घडीला अभ्यास केला असता या दोन्ही प्रकारामध्ये आशा स्वयंसेविकांनी लक्षणीय कार्य केल्याचे दिसून येते. एक हजार ५०० लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका अशा तत्वानुसार आशा वर्करची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्रात आजघडीला ६० हजार आशा स्वयंसेविका आहेत. परंतु, त्यांना मिळणारे मानधन आणि मोबदला हा अत्यंत अल्प आहे.मराठवाड्यात आठ हजार ‘आशा’मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये एकूण आठ हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. त्यात औरंगाबाद- १६६८, जालना- १४७१, परभणी- ९१६, हिंगोली- ९३६, लातूर- १६२३, नांदेड- १४२३, उस्मानाबाद- ११६१, बीड- १९०४ अशी संख्या आहे.आर्थिक स्तर उंचावणे गरजेचे‘आशा’ स्वयंसेविकांचा मुद्दा हेरून अंबड येथील गोदावरी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रमेश वाघमारे यांनी आपल्या पीएच.डी.चा विषय निवडला. त्यात त्यांनी सखोल संशोधन करून आशा स्वयंसेविकांची राज्यातील स्थिती जाणून घेतली. त्यानुसार अंगणवाडी ताईंसारखी त्यांची नेमणूक करून त्याच प्रमाणे त्यांना वाढीव मानधन देण्याचा शोध प्रबंध सादर केला. या प्रबंधातील तरतूदींकडे राज्य सरकारने लक्ष देण्याचे ठरविल्यास आपण त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत.

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिलाRajesh Topeराजेश टोपे