शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:01 IST

सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधीच उल्हास आणि त्यात सलग सुट्यांचा सुकाळ यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि बच्चे कंपनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु या सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.जालना जिल्ह्यात यापूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविध विभागांमध्ये जवळपास दोनशेपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने कामकाज ढेपाळले आहे. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी हे औरंगाबाद, परभणी येथून अप-डाऊन करीत असल्याने जालन्यातील कार्यालये ही रेल्वे वेळापत्रकानुसार चालतात. जिल्ह्यातील तालुक्यांच्या मुख्यालयी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची मानसिकता नाही. याचा परिणाम कामकाजावर पडत आहे.१ ते १५ आॅगस्ट दरम्यान, सरासरी सहा सुट्या आल्या आहेत. त्यातच काही सुट्या या सलग आल्या असल्याने अनेकांनी शुक्रवारी किरकोळ रजा टाकून गुरुवार ते रविवार असा सुटीचा आनंद घेतला.जिल्ह्यातील मुख्यालयांमध्ये सोमवार आणि शुक्रवार या दिवशी अधिकाºयांनी दौरे करू नयेत, असे निर्देश आहेत. परंतु आठवड्यातील फार क्वचित वेळेस संबंधित विभागाचे अधिकारी ज्या नागरिकांचे त्या विभागात काम आहे, तेथे उपलब्ध होतात. यामुळे सर्वसामान्यांची घोर निराशा होत आहे.एकूणच जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमि अभिलेख, पाटबंधारे, जिल्हा परिषदेतील विविध विभाग तसेच पंचायत समिती, जीवन प्राधिकरण, शासकीय ग्रंथालय आदी विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाºयांची भेट होणे म्हणजे एक प्रकारचा दुर्मिळ योग असल्याचे मानले जाते.पंचनामा करूनही जैसे थे...जालना शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी नसल्याची तक्रार यापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिका-यांकडे केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष होते.यापूर्वी देखील अनेक विभागांचा थेट तहसीलच्या अधिकारी कर्मचाºयांना सोबत घेऊन पंचनामा केला. परंतु त्यालाही कर्मचारी जुमानत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंनीच लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनी केली.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागGovernmentसरकारJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद