शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पानीपत’ची ऐतिहासिक शौर्य यात्रा येणार परतुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:34 IST

मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

ठळक मुद्देसैनिकांचा झाला मुक्काम : युध्दाची झाली होती खलबते; शहराच्या इतिहासाला मिळणार उजाळा

परतूर : मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.पानीपत युध्दाची बरीच खलबते व युध्दाची रणानिती परतूर येथे सैन्य मुक्कामी असताना शिजली होती. पानीपतच्या तिसऱ्या लढाईसाठी १४ मार्च १७६० रोजी परतूर हून सैन्याची आगेकूच झाली होती. ४५ हजार सैन्याचा फौजफाटा व सरसेनापती भाऊसाहेब पेशवे, इब्राहीम गारदीसह शूर मराठे सरदार हे परतूर मुक्कामी होते. या मुक्कामीच या पानीपत युध्दाची बरीच खलबते शिजली होती. याच ठिकाणी सैन्याजवळ अपुरा पैसा असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. याच मुक्कमी नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव विश्वासराव पेशवे यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व देण्यात आले. शहराच्या पश्चिम दिशेला असलेले ऐतिहासिक नृसिंह मंदिर, लिंगायत समाजाचे मठ, शहापी बोधले परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानावर या सैन्याचा मुक्काम झाला होता.परतूरचे हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता शौर्ययात्रा, पानीपत यात्री एक दिवस मुद्दाम परतूर मुक्कामी येऊन दुसºया दिवशी पानीपतकडे आगेकूच करणार आहे. पानीपत हा मराठ्यांचा धगधगता इतिहास आहे. हा इतिहास जागृत व्हावा व नवीन पिढीला माहिती मिळावी म्हणून कोल्हापूर ते पानीपत ही शौर्य यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मराठे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने नेण्यात येत आहे. या यात्रेचे कोल्हापूर येथून प्रयाण होत आहे. ज्या ठिकाणी पानीपत युध्दासाठी सैन्याचे पाडाव पडले. त्या ठिकाणी इतिहासकार माहिती देणार आहेत.शौर्याचा इतिहास जागा होईलया शौर्य यात्रेच्या मुक्कामाने युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळेल. सैन्याचे शौर्य हे आजच्या युवकांपुढे यायला पाहिजे. त्यांना इतिहास कळायला पाहिजे. हाच हेतू या यात्रेचा आहे. तसेच तज्ज्ञ इतिहासकारांचे व्याख्यानही यावेळी होणार असल्याचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी सांगितले.युध्दाच्या आठवणीउदगीर- परतूर- बुºहाणपूर- देवास- गुणा- गव्हालेर- कुरूक्षेत्र- पानीपत या ठिकाणी या यात्रेचे पडाव पडणार आहेत. पानीपत युध्दात विरगती प्राप्त झालेल्या ६० हजार मराठा सैनिकांना अभिवादन करण्यासाठी १४ जानेवारी २०२० रोजी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एकूणच या शौर्ययात्रेने पानीपत युध्दाच्या आठवणी जाग्या होण्याबरोबरच परतूरच्या इतिहासाला उजाळा मिळेल.

टॅग्स :JalanaजालनाhistoryइतिहासPeshwaiपेशवाई