शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

‘पानीपत’ची ऐतिहासिक शौर्य यात्रा येणार परतुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:34 IST

मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

ठळक मुद्देसैनिकांचा झाला मुक्काम : युध्दाची झाली होती खलबते; शहराच्या इतिहासाला मिळणार उजाळा

परतूर : मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.पानीपत युध्दाची बरीच खलबते व युध्दाची रणानिती परतूर येथे सैन्य मुक्कामी असताना शिजली होती. पानीपतच्या तिसऱ्या लढाईसाठी १४ मार्च १७६० रोजी परतूर हून सैन्याची आगेकूच झाली होती. ४५ हजार सैन्याचा फौजफाटा व सरसेनापती भाऊसाहेब पेशवे, इब्राहीम गारदीसह शूर मराठे सरदार हे परतूर मुक्कामी होते. या मुक्कामीच या पानीपत युध्दाची बरीच खलबते शिजली होती. याच ठिकाणी सैन्याजवळ अपुरा पैसा असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. याच मुक्कमी नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव विश्वासराव पेशवे यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व देण्यात आले. शहराच्या पश्चिम दिशेला असलेले ऐतिहासिक नृसिंह मंदिर, लिंगायत समाजाचे मठ, शहापी बोधले परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानावर या सैन्याचा मुक्काम झाला होता.परतूरचे हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता शौर्ययात्रा, पानीपत यात्री एक दिवस मुद्दाम परतूर मुक्कामी येऊन दुसºया दिवशी पानीपतकडे आगेकूच करणार आहे. पानीपत हा मराठ्यांचा धगधगता इतिहास आहे. हा इतिहास जागृत व्हावा व नवीन पिढीला माहिती मिळावी म्हणून कोल्हापूर ते पानीपत ही शौर्य यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मराठे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने नेण्यात येत आहे. या यात्रेचे कोल्हापूर येथून प्रयाण होत आहे. ज्या ठिकाणी पानीपत युध्दासाठी सैन्याचे पाडाव पडले. त्या ठिकाणी इतिहासकार माहिती देणार आहेत.शौर्याचा इतिहास जागा होईलया शौर्य यात्रेच्या मुक्कामाने युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळेल. सैन्याचे शौर्य हे आजच्या युवकांपुढे यायला पाहिजे. त्यांना इतिहास कळायला पाहिजे. हाच हेतू या यात्रेचा आहे. तसेच तज्ज्ञ इतिहासकारांचे व्याख्यानही यावेळी होणार असल्याचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी सांगितले.युध्दाच्या आठवणीउदगीर- परतूर- बुºहाणपूर- देवास- गुणा- गव्हालेर- कुरूक्षेत्र- पानीपत या ठिकाणी या यात्रेचे पडाव पडणार आहेत. पानीपत युध्दात विरगती प्राप्त झालेल्या ६० हजार मराठा सैनिकांना अभिवादन करण्यासाठी १४ जानेवारी २०२० रोजी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एकूणच या शौर्ययात्रेने पानीपत युध्दाच्या आठवणी जाग्या होण्याबरोबरच परतूरच्या इतिहासाला उजाळा मिळेल.

टॅग्स :JalanaजालनाhistoryइतिहासPeshwaiपेशवाई