शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘पानीपत’ची ऐतिहासिक शौर्य यात्रा येणार परतुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:34 IST

मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

ठळक मुद्देसैनिकांचा झाला मुक्काम : युध्दाची झाली होती खलबते; शहराच्या इतिहासाला मिळणार उजाळा

परतूर : मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.पानीपत युध्दाची बरीच खलबते व युध्दाची रणानिती परतूर येथे सैन्य मुक्कामी असताना शिजली होती. पानीपतच्या तिसऱ्या लढाईसाठी १४ मार्च १७६० रोजी परतूर हून सैन्याची आगेकूच झाली होती. ४५ हजार सैन्याचा फौजफाटा व सरसेनापती भाऊसाहेब पेशवे, इब्राहीम गारदीसह शूर मराठे सरदार हे परतूर मुक्कामी होते. या मुक्कामीच या पानीपत युध्दाची बरीच खलबते शिजली होती. याच ठिकाणी सैन्याजवळ अपुरा पैसा असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. याच मुक्कमी नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव विश्वासराव पेशवे यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व देण्यात आले. शहराच्या पश्चिम दिशेला असलेले ऐतिहासिक नृसिंह मंदिर, लिंगायत समाजाचे मठ, शहापी बोधले परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानावर या सैन्याचा मुक्काम झाला होता.परतूरचे हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता शौर्ययात्रा, पानीपत यात्री एक दिवस मुद्दाम परतूर मुक्कामी येऊन दुसºया दिवशी पानीपतकडे आगेकूच करणार आहे. पानीपत हा मराठ्यांचा धगधगता इतिहास आहे. हा इतिहास जागृत व्हावा व नवीन पिढीला माहिती मिळावी म्हणून कोल्हापूर ते पानीपत ही शौर्य यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मराठे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने नेण्यात येत आहे. या यात्रेचे कोल्हापूर येथून प्रयाण होत आहे. ज्या ठिकाणी पानीपत युध्दासाठी सैन्याचे पाडाव पडले. त्या ठिकाणी इतिहासकार माहिती देणार आहेत.शौर्याचा इतिहास जागा होईलया शौर्य यात्रेच्या मुक्कामाने युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळेल. सैन्याचे शौर्य हे आजच्या युवकांपुढे यायला पाहिजे. त्यांना इतिहास कळायला पाहिजे. हाच हेतू या यात्रेचा आहे. तसेच तज्ज्ञ इतिहासकारांचे व्याख्यानही यावेळी होणार असल्याचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी सांगितले.युध्दाच्या आठवणीउदगीर- परतूर- बुºहाणपूर- देवास- गुणा- गव्हालेर- कुरूक्षेत्र- पानीपत या ठिकाणी या यात्रेचे पडाव पडणार आहेत. पानीपत युध्दात विरगती प्राप्त झालेल्या ६० हजार मराठा सैनिकांना अभिवादन करण्यासाठी १४ जानेवारी २०२० रोजी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एकूणच या शौर्ययात्रेने पानीपत युध्दाच्या आठवणी जाग्या होण्याबरोबरच परतूरच्या इतिहासाला उजाळा मिळेल.

टॅग्स :JalanaजालनाhistoryइतिहासPeshwaiपेशवाई