शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

दोन तास धो..धो..पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:51 IST

जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जालना शहरात सायंकाळी सहानंतर दोन तास मेघगर्जनेसह पाऊस झाला. त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते. जाफराबाद, परतूर, बदनापूर, अंबड तालुक्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मृग नक्षत्रात पावसाने प्रथमच जोरदार हजेरी लावल्यामुळे बळिराजा सुखावला आहे.जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वातावरणातही प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मृग नक्षत्र लागल्यापासून दोन दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आजही बरसणार की नाही, असे वाटत असतानाच जालना शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल अडीच धो धो पाऊस बरसला. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मस्तगड परिसरात नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. शिवाजी पुतळा, कादराबाद, मामा चौक परिसरातील रस्तेही जलमय झाले होते.जालना तालुक्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. तालुक्यातील वंजारउमद्र, पीरपिंपळगाव, माळशेंद्रा, गोंदेगाव, माळेगाव, जामवाडी, गुंडेवाडी, घानेवाडी, पानशेंद्रा, इंदेवाडी, सिरसवाडी, कडवंची, नंदापूर, धारकल्याण, रामनगर, रेवगाव, गोलापांगरी शिवारात पावसाने दोन ते अडीच तास जोरदार हजेरी लावली. भोकरदन, केदारखेडा, पारध, टेंभूर्णी, नांदखेड, हसनाबाद परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदखेड परिसरात हवेमुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले. अंबड तालुक्यातही बहुतांश भागात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. भोकरदन परिसरातीही रात्री नऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.दरम्यान, जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. आता खऱ्या अर्थाने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. बहुतांश भागात शेतकºयांनी कपाशी लागवडीसाठी शेत तयार करून शेतात ठिबक सिंचन अंथरून ठेवले आहे. काही शेतकºयांनी बी-बियाणांची खरेदी पूर्ण केली आहे. त्यामुळे कपाशी लागवडीसह पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.गैरसोय : सहा तास वीजपुरवठा खंडितजालन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी सात ते १२ वाजेपर्यंत सहा तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अगोदरच पाणी साचलेल्या रस्त्यावरून अंधारातून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. ग्रामीण भागातही बहुतांशी ठिकाणी वीज गेल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारातच काढावी लागली.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज