शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

दोन तास धो..धो..पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:51 IST

जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जालना शहरात सायंकाळी सहानंतर दोन तास मेघगर्जनेसह पाऊस झाला. त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते. जाफराबाद, परतूर, बदनापूर, अंबड तालुक्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मृग नक्षत्रात पावसाने प्रथमच जोरदार हजेरी लावल्यामुळे बळिराजा सुखावला आहे.जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वातावरणातही प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मृग नक्षत्र लागल्यापासून दोन दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आजही बरसणार की नाही, असे वाटत असतानाच जालना शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल अडीच धो धो पाऊस बरसला. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मस्तगड परिसरात नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. शिवाजी पुतळा, कादराबाद, मामा चौक परिसरातील रस्तेही जलमय झाले होते.जालना तालुक्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. तालुक्यातील वंजारउमद्र, पीरपिंपळगाव, माळशेंद्रा, गोंदेगाव, माळेगाव, जामवाडी, गुंडेवाडी, घानेवाडी, पानशेंद्रा, इंदेवाडी, सिरसवाडी, कडवंची, नंदापूर, धारकल्याण, रामनगर, रेवगाव, गोलापांगरी शिवारात पावसाने दोन ते अडीच तास जोरदार हजेरी लावली. भोकरदन, केदारखेडा, पारध, टेंभूर्णी, नांदखेड, हसनाबाद परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदखेड परिसरात हवेमुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले. अंबड तालुक्यातही बहुतांश भागात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. भोकरदन परिसरातीही रात्री नऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.दरम्यान, जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. आता खऱ्या अर्थाने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. बहुतांश भागात शेतकºयांनी कपाशी लागवडीसाठी शेत तयार करून शेतात ठिबक सिंचन अंथरून ठेवले आहे. काही शेतकºयांनी बी-बियाणांची खरेदी पूर्ण केली आहे. त्यामुळे कपाशी लागवडीसह पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.गैरसोय : सहा तास वीजपुरवठा खंडितजालन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी सात ते १२ वाजेपर्यंत सहा तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अगोदरच पाणी साचलेल्या रस्त्यावरून अंधारातून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. ग्रामीण भागातही बहुतांशी ठिकाणी वीज गेल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारातच काढावी लागली.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज