शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जालन्यात आस्मानी कहर; वादळी वाऱ्यासह पावसाने झाडे उन्मळली, कोंबड्यांची २०० पिले ठार

By विजय मुंडे  | Updated: April 28, 2023 19:13 IST

शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका सुरूच

जालना : जिल्ह्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुपारीही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. या पावसाचा फळपिकांसह रब्बीतील पिकांनाही फटका बसला आहे. बदनापूर तालुक्यातील मानेवाडी शिवारात कोंबड्यांची २०० पिले ठार झाली, तर सागरवाडी शिवारात एका गायीचाही मृत्यू झाला आहे.

जालना शहरासह तालुक्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुपारी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील सागरवाडी शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात वीज पडल्याने, जीवन दौलत खोकड यांची गाय ठार झाली, तर वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा मारा झाल्याने मानेवाडी रामधन खोकड यांच्याकडील कोंबड्यांची २०० पिले ठार झाली. या दोन्ही घटनांचा तलाठी सरला मरमट यांनी पंचनामा केला. भोकरदन शहरासह तालुक्यातील केदारखेडा, राजूर परिसरातही पाऊस झाला. जाफराबाद शहरासह तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले.

वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनलचे नुकसानकुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील बंगलेवाडी येथील शेतकरी कलाबाई दशरथ गव्हाणे यांच्या शेतातील कृषिपंपाच्या सोलार पाट्यांचे वादळी वारा व गारपिटीमुळे नुकसान झाले. बुधवारी दुपारी आलेले वादळ आणि पावसासोबत पडलेल्या गारांमुळे कलाबाई गव्हाणे यांच्या भेंडाळा तांडा शिवारातील शेतातील सोलर पॅनलचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मिरची, मका पिकावर पाणीवडोद तांगडा : वडोदतांगडा व परिसरात शुक्रवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. या भागातील मिरची, मका पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, शिवाय कडबा भिजल्याने नुकसान झाले आहे. या भागात जोरदार पाऊस झाल्याने नाले, ओढे भरून वाहिले.

राणीउंचेगाव परिसरात मोसंबीची फळगळराणीउंचेगांव : घनसावंगी तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे मोसंबीच्या अंबिया बहरातील फळाची गळ होत असल्याने, शेतकरी हवालदिल झाले आहेत. तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, राणीउंचेगांव परिसराला अवकाळीचा तडाखा बसला आहे. राणीउंचेगाव परिसरात शुक्रवारी दोन तास पाऊस झाल्याने नुकसान झाले. वादळी वाऱ्यात घरावरील, शाळेवरील पत्रे उडाली, तसेच झाडेही उन्मळून पडली होती.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती