शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

परमार्थात जो आनंद आहे, तो कुठेही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST

महाकाळा (अंकुशनगर) : भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भजनामध्ये जो आनंद आहे, त्यामुळे सर्व दु:ख दूर होतात. दु:खामध्ये दु:ख देण्याचे ...

महाकाळा (अंकुशनगर) : भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भजनामध्ये जो आनंद आहे, त्यामुळे सर्व दु:ख दूर होतात. दु:खामध्ये दु:ख देण्याचे सामर्थ्य राहत नाही. म्हणून त्यामध्ये आनंद मिळतो. परमार्थात जो आनंद आहे, तो जगात कुठेही मिळू शकत नाही. अशा प्रकारच्या आनंदाचा उपभोग घेणारे आपण सारे वारकरी आहोत, देव कुणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत, त्यासाठी हजारो वर्षांची पुण्याई लागते, असे हभप लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी सांगितले.

अंबड तालुक्यातील भगवाननगर येथे संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. यावेळी हभप जगन्नाथ सांगळे, हभप शिवाजी उगले, हभप हरिदास सुळे, जि.प. सभापती बाळासाहेब म्हस्के, अशोक चिमणे, संतोष आदमाने, संजय कव्हळे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना महाराज म्हणाले की, कुठल्याही कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. काल्याचे कीर्तन ज्यांना भगवत गीतेचे ज्ञान त्यांनीच करावे. संत वामनभाऊ यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे खूप मोठे कार्य केले. अशा थोर महात्म्याची पुण्यतिथी साजरी केल्याने समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होते. संत वामनभाऊ, संत भगवान बाबांनी स्वत:चा जीव समाजातील घटकांसाठी चंदणाप्रमाणे झिजविला. मेंगडे महाराज यांनी आपल्या ओघवत्या भाषेतील मनोगताने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. शुद्धत्व कधीही संपत नसते, तर त्यामध्ये सातत्याने वाढ होत असते. असे न संपणारे शुद्धत्व वारक-यांकडे असते. वारकरी संप्रदाय आपल्या परीने जनजागृती व सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो, असेही ते म्हणाले.

फोटो ओळी

भगवाननगर येथे काल्याच्या कीर्तनात बोलताना हभप लक्ष्मण महाराज मेंगडे व इतर.