शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

तासिका तत्त्वावरील गुरुजी शेत मजुरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनुदानाच्या मुद्यावरून रान पेटले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनुदानाच्या मुद्यावरून रान पेटले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले उच्च शिक्षित युवक युवतींना तासिका तत्वावर काम मिळत होते. कोरोनाने तेही हिरावले असून, आता अनेकजण आपला पारंपरिक व्यवसाय किंवा अन्य ठिकाणी नोकरी करून उदरनिर्वाह भागवित आहेत.

राज्य सरकारने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. परंतु सरकार बदलले तरी देखील आश्वासनांव्यतिरिक्त काहीच पदरात पडले नसल्याने सर्वत्र निराशेचे वातावरण आहे.

उच्चशिक्षण घेऊन फायदा तो काय ?

वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर नोकरी करताना जे निकष ठरविले आहे, त्या निकषानुसार आज हजारो युवक-युवती तासिका तत्वावर काम करत आहेत. अनेकांनी पीएच.डी मिळविलेली आहे. परंतु एवढे शिक्षण घेऊनही जर बेरोजगार राहण्याची वेळ येत असेल तर, या शिक्षणाचा उपयोग तरी काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. - सचिन संगेकर, प्राध्यापक

राज्य सरकारच्या धोरणाविरूद्ध आमच्या प्राध्यापकांकडून पाठपुरावा केला जात आहे. सद्य स्थितीत शासनाने एक समिती नेमली आहे. या समितीकडे शिफारशी करण्यात येत असून, या समितीच्या अहवालानंतर चांगले परिणाम येतील, अशी आशा आहे.

- रमेश वाघमारे, प्राध्यापक

गेल्या अठरा महिन्यांपासून कोरोनामुळे तासिका तत्त्वावरील मिळणारे मानधनही बंद आहे. शिवणगाव येथे थोडीबहुत शेती आहे. त्या शेतीतच आता आपण भावाला मदत करत असल्याने कसा बसा उदरनिर्वाह भागवून कुटुंबांचा गाडा चालवत आहोत.

- शिवाजी तौर, प्राध्यापक

सेट, नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच

प्राध्यापक व्हावे म्हणून राज्य सरकारने नेट आणि सेट पात्रता परीक्षा बंधनकारक केल्या आहेत. या परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्याचा उपयोग नाही.

सरकारने एक धोरण ठरवून किमान ३० हजार रुपये महिना सर्व तासिका तत्त्वावरील उमेदवारांना देण्याची गरज आहे.

१० वर्षांपासून लटकला प्रश्न

n तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसह सहायक प्राध्यापकांच्या मुद्यावरून सरकार अडचणीत सापडले आहे.

n आर्थिक तरतूद आणि वेगवेगळे तांत्रिक निकष यामुळे आमचे प्रश्न निकाली निघत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.