शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

जालना : जालना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे अधिकारी व ...

जालना : जालना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जालना जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत तब्बल सहा हजार ६५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम पहिले. त्यांना अडीच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानधन दिले नाही. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्यांना मानधनच दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने तातडीने मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अडीच हजार रुपयांचे दिले जातेय मानधन

ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. हे मानधन तहसील कार्यालयाकडून दिले जाते. मानधन तीन टप्प्यांत दिले जाते. परंतु, यासाठी तहसील कार्यालयांकडे निधीच उपलब्ध नसल्याने मानधन दिले जात नाही. यंदाही शासनाने निधी न दिल्याने अधिकारी व कर्मचारी मानधनापासून वंचित राहिले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीचे मानधन मिळाले

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहा ते सात महिन्यांनंतर मानधन मिळाले आहे. परंतु, गतपंचवार्षिकला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन अद्यापही मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ज्याप्रकारे शासन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करून घेते, त्याच प्रकारे शासनाने मानधन दिले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन हे तहसील कार्यालयांकडून दिले जाते. त्यासाठी विशेष निधी सुद्धा असतो. परंतु, निधी प्राप्त न झाल्याने सदरील मानधन देण्यात आले नाहीत. प्रत्येकी अडीच ते तीन हजार रुपयांचे मानधन दिले जाते. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६६५० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.

राजीव शिंदे, तहसीलदार