शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

ग्रा. पं. निवडणुकीत उमेदवार, कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीला प्रशासनाचा फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST

जालना जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात संपली होती. त्यापैकी १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, आता ...

जालना जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात संपली होती. त्यापैकी १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, आता ४५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. ८ हजार १५७ उमेदवार रिंगणात उरतले असून, या उमेदवारांचीही प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. राज्यात सध्या नव्या कोरोनाचे ८ ते ९ रूग्ण सापडले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, असे असताना प्रशासनाकडून उमेदवार, अधिकारी व कर्मचारी यांच्या तपासणीला फाटा देण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली

मतदान करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची सुरूवातीला कोरोना तपासणी केली जाणार आहे. ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसतील, त्याला रूग्णवाहिकेद्वारे कोविड सेंटरला नेले जाईल. मतदानासाठी येणाऱ्या व्यक्तीचे तापमानदेखील तपासण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, असे असले तरी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी निवड करण्यात आली आहे, त्यांच्या कोरोना चाचणीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १३७ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड

जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ४५७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ही निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. एकूण १३७ क्षेत्रीय अधिकारी व ११३ निवडणूक अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.