शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा रिक्त जागा भरण्यासाठी फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:50 IST

एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नसले तरी, त्यांना २३ आणि २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नसले तरी, त्यांना २३ आणि २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.मराठवाडा विभागाचा विचार केल्यास शासकीय तंत्रनिकेतनची संख्या ही ११ आहे. यासाठी केवळ आठ हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून प्रवेशासाठीच्या आॅप्शन आणि कॅप राऊंडमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र मॅकेनिकल, सिव्हील आणि इलेक्ट्रीकल वगळता आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विभागाच्या डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मराठवाडा विभागात खाजगी तंत्रनिकेतनची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. यंदा शासकीय महाविद्यालयानांच आवश्यक तेवढे विद्यार्थी उपलब्ध होण्याची चिन्ह नसल्याने खाजगी तंत्रनिकेतनचा तर विचार न केलेलाच बरा; असे सूत्रांनी सांगितले.या विद्यार्थी संख्येच्या प्रश्नावर उतारा म्हणून आता ज्यांनी तंत्रनिकेतनच्या प्रवेशाच्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नाही, परंतु त्यांना शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, अशा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २३ आॅगस्ट तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.एकीकडे जालन्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा देण्यात येणार होता. तसेच सध्याचे तंत्रनिकेतन हे दुसऱ्या शिप्टमध्ये चालविण्याचा विचारही अंमलात येणार होता. मात्र, आता तंत्रनिकेतनलाच विद्यार्थी मिळत नसल्याने अभियांत्रिकी दूरच राहिले ते बरेच झाले, असे म्हणावे लागेल.५० टक्केच शुल्क लागणारपंजाबराव देशमुख प्रतिपूर्ती योजने अंतर्गत ईबीसी सवलत असणाºया विद्यार्थ्यांना आता प्रवेशाच्या वेळी केवळ ५० टक्केच शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकाडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी किमान ५० टक्केच रक्कम असणे आवश्यक करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणiti collegeआयटीआय कॉलेज