शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा रिक्त जागा भरण्यासाठी फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:50 IST

एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नसले तरी, त्यांना २३ आणि २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नसले तरी, त्यांना २३ आणि २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.मराठवाडा विभागाचा विचार केल्यास शासकीय तंत्रनिकेतनची संख्या ही ११ आहे. यासाठी केवळ आठ हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून प्रवेशासाठीच्या आॅप्शन आणि कॅप राऊंडमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र मॅकेनिकल, सिव्हील आणि इलेक्ट्रीकल वगळता आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विभागाच्या डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मराठवाडा विभागात खाजगी तंत्रनिकेतनची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. यंदा शासकीय महाविद्यालयानांच आवश्यक तेवढे विद्यार्थी उपलब्ध होण्याची चिन्ह नसल्याने खाजगी तंत्रनिकेतनचा तर विचार न केलेलाच बरा; असे सूत्रांनी सांगितले.या विद्यार्थी संख्येच्या प्रश्नावर उतारा म्हणून आता ज्यांनी तंत्रनिकेतनच्या प्रवेशाच्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नाही, परंतु त्यांना शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, अशा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २३ आॅगस्ट तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.एकीकडे जालन्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा देण्यात येणार होता. तसेच सध्याचे तंत्रनिकेतन हे दुसऱ्या शिप्टमध्ये चालविण्याचा विचारही अंमलात येणार होता. मात्र, आता तंत्रनिकेतनलाच विद्यार्थी मिळत नसल्याने अभियांत्रिकी दूरच राहिले ते बरेच झाले, असे म्हणावे लागेल.५० टक्केच शुल्क लागणारपंजाबराव देशमुख प्रतिपूर्ती योजने अंतर्गत ईबीसी सवलत असणाºया विद्यार्थ्यांना आता प्रवेशाच्या वेळी केवळ ५० टक्केच शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकाडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी किमान ५० टक्केच रक्कम असणे आवश्यक करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणiti collegeआयटीआय कॉलेज