शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शासनाचा रिक्त जागा भरण्यासाठी फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:50 IST

एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नसले तरी, त्यांना २३ आणि २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नसले तरी, त्यांना २३ आणि २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.मराठवाडा विभागाचा विचार केल्यास शासकीय तंत्रनिकेतनची संख्या ही ११ आहे. यासाठी केवळ आठ हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून प्रवेशासाठीच्या आॅप्शन आणि कॅप राऊंडमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र मॅकेनिकल, सिव्हील आणि इलेक्ट्रीकल वगळता आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विभागाच्या डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मराठवाडा विभागात खाजगी तंत्रनिकेतनची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. यंदा शासकीय महाविद्यालयानांच आवश्यक तेवढे विद्यार्थी उपलब्ध होण्याची चिन्ह नसल्याने खाजगी तंत्रनिकेतनचा तर विचार न केलेलाच बरा; असे सूत्रांनी सांगितले.या विद्यार्थी संख्येच्या प्रश्नावर उतारा म्हणून आता ज्यांनी तंत्रनिकेतनच्या प्रवेशाच्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नाही, परंतु त्यांना शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, अशा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २३ आॅगस्ट तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.एकीकडे जालन्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा देण्यात येणार होता. तसेच सध्याचे तंत्रनिकेतन हे दुसऱ्या शिप्टमध्ये चालविण्याचा विचारही अंमलात येणार होता. मात्र, आता तंत्रनिकेतनलाच विद्यार्थी मिळत नसल्याने अभियांत्रिकी दूरच राहिले ते बरेच झाले, असे म्हणावे लागेल.५० टक्केच शुल्क लागणारपंजाबराव देशमुख प्रतिपूर्ती योजने अंतर्गत ईबीसी सवलत असणाºया विद्यार्थ्यांना आता प्रवेशाच्या वेळी केवळ ५० टक्केच शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकाडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी किमान ५० टक्केच रक्कम असणे आवश्यक करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणiti collegeआयटीआय कॉलेज