शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सरकारचे धोरण सहकार चळवळीला बाधा आणणारे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:27 IST

सरकारचे कुठलेही धोरण सहकार चळवळीस बाधा आणणारे नसल्याचे प्रतिपादन सहकार परिषदेचे राज्याध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सहकारक्षेत्रात सध्या संक्रमणाचा काळ सुरू असून, काही विशिष्ट घटकांकडून या क्षेत्राविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहे. त्यामुळे येथे संभ्रमावस्थेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. असे असले तरी सरकारकडून सहकार चळवळीला बळ दिले जात आहे. सरकारचे कुठलेही धोरण सहकार चळवळीस बाधा आणणारे नसल्याचे प्रतिपादन सहकार परिषदेचे राज्याध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.शहरातील आयएमए हॉल येथे शनिवारी सहकार भारती जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित सहकार मेळावा- कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष शिवरतन मुंदडा, औरंगाबादचे सी.ए. निखिल जाजू, जालना मर्चंट बँकेचे संचालक सुभाषचंद देवीदान, सचिव अ‍ॅड. दशरथ इंगळे, उपाध्यक्ष हेमंत ठक्कर, किशोर देशपांडे यांची उपस्थिती होती.चरेगावकर म्हणाले की, राज्यात सध्या २ लाख ३८ हजार नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहेत. त्यातील अनेक पतसंस्थांनी लेखा परीक्षण अहवालच सादर केलेला नसल्याने व काहींचे पत्ते शोधूनही सापडत नसल्याने ५४ हजार बोगस सहकारी पतसंस्था बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. दरम्यान, ज्यांच्या संस्था बंद पडणार आहेत, त्यांच्याकडूनच सहकार क्षेत्राविषयी कोल्हेकुई सुरू आहे. आज पतसंस्थांनी काळाची पाऊले ओळखून बदल केले पाहिजेत. जीएसटीमुळे लोकांमध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. मात्र, जीएसटी ही आपत्ती नसून, इष्टापत्तीच आहे. नोटाबंदीच्या काळात विविध बँकांकडून ग्राहकांना पैसे देताना अडचणी निर्माण झाल्या. मात्र, याच काळात पैसे मिळण्यासाठी त्रास झाल्याचे उदाहरण कुठल्याच पतसंस्थेत पाहावयास मिळाले नसल्याचेही चरेगावकर यांनी सांगितले.