शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

दुष्काळी परिस्थितीत सरकारच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:07 IST

जिल्ह्यात दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला असून, आता सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी, दुष्काळसाठीच्या उपयोजना या कागदोपत्री राहू नयेत यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच यंत्रणेनेला आदेशित करणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देजालना : अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन थांबविण्याचे आव्हान, मुख्यमंत्र्यांनीच लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला असून, आता सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी, दुष्काळसाठीच्या उपयोजना या कागदोपत्री राहू नयेत यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच यंत्रणेनेला आदेशित करणे अपेक्षित आहे.जालना जिल्ह्यातील बहुतांश कार्यालये ही रेल्वेच्या वेळपत्रकानुसार चालत असल्याने किमान दुष्काळ असल्याने आता तरी आठ महिने अधिकारी, कर्मचाºयांचे अप-डाऊन बंद केल्याासच थोडीफार मदत होऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील मंठा वगळता अन्य सातही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यासाठी दुष्काळातील उपयोजना जिल्हा प्रशासनाने केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होऊन ती शेतकºयांपर्यंत पोहचली पाहिजे याची दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने जून ते आक्टोबर या महिन्यात पाणी टंचाई आराखड्यावर २२ कोटी रूपये खर्च केले आहेत. तर आता ११ कोटी ८७ लाख रूपयांचा आढावा तयार केला आहे.त्यात जवळपास १ हजार ७८ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने विहीर अधिग्रहण करणे, तात्पुरती नळयोजना तसेच टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा समावेश आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक गावांना दुष्काळी सुविधांचा लाभ होणार आहे.राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केलेल्या कर्जमाफीतून जवळपास एक लाख १० हजार शेतकºयांना ५९१ कोटी ६६ लाख रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. तर यंदाच्या खरीप हंगामात एक हजार २०० कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. पैकी ७१ टक्के म्हणजचे जवळपास ८९१ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रबी हंगामासाठी २६६ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले आहे.

टॅग्स :JalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी