शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे शालेय पोषण आहारासह गरोदर महिला, स्तनदा माता यांना ...

जालना : जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे शालेय पोषण आहारासह गरोदर महिला, स्तनदा माता यांना घरपोच कोरडा पोषण आहार शासनाच्या निकषानुसार पुरविला जात असल्याचे सांगण्यात आले.

शालेय पोषण आहाराप्रमाणेच जिल्ह्यातील गरोदर महिला, स्तनदा माता यांना कुपोषणाचा फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारच्या वतीने पोषण आहार वितरित केला जातो. या पोषण आहाराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे हे हेाते. शाळेतच भोजन मिळत असल्यास अनेकजण आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

जालना जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचे वितरण हे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून केले जाते. या अंतर्गत तांदूळ, गहू, डाळ आणि फोडणी देण्यासाठी तेलाचे पाकीट मिळते परंतु कोरोनापूर्वी संबंधित लाभार्थ्यांना शिजवून शाळेमध्ये वाटप केले जात होते.

काय-काय मिळते

केंद्र सरकारकडून कुपोषण निर्मूलनासाठी विशेष पुढाकार घेतला जात आहे. त्यानुसार आहार तज्ज्ञांच्या सूचनेनुसार कुठला पोषण आहार देण्याचे ठरते.

कुपोषण निर्मूलनासाठी विशेष करुन जीवनसत्त्व वाढविण्यावर भर दिला जातो. त्यात प्रोटीन तसेच सी आणि जीवनसत्त्व बी यांना प्राधान्य दिले जाते.

आहार अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तांदूळ, गहू, तसेच साखर याचाही समावेश असतो. सकस आहार देण्याचा उद्देश या योजनेचा आहे.

कोरोना काळातही पुरवठा सुरळीत

शालेय तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे चांगले परिणाम देखील समोर आले आहेत. पोषण आहारामुळे शालेय विद्यार्थ्याची उपस्थिती वाढली असून पोषण आहारामुळे गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पोषण आहार मिळत असल्याने त्यांच्या आरोग्यात सकारात्मक बदल झाला असल्याचे दिसून येत आहे.

- संगीता लोंढे­, उपमुख्य अधिकारी

फोडणी कशी द्यायची

गरोदर आणि स्तनदा मातांसाठी देखील केंद्र सरकार पोषण आहार देत आहे. त्याचा मोठा लाभ या महिलांना होत असून कोरोना काळातही घरपोच पुरवठा केला जात असल्याने मदत होत आहे.

- आशामती तांदळे, सामनगाव

आज ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंब हे मोलमजुरी करुन उपजीविका भागवितात. त्यामुळे घरात गरोदर महिला असतानाही तिला योग्य तो आहार दिला जात नाही. या उपक्रमाचा मोठा लाभ झाला आहे.

- भागूबाई पाटील, पारडगाव

शालेय पोषण आहार उपलब्ध होत असल्याने मुलांना शाळेची गोडी लागली आहे, परंतु शाळा बंद असतानाही हे पोषण आहाराचे किट घरपोच मिळत असल्याने त्याचा मोठा लाभ गोरगरिबांना होत आहे.

- विठ्ठल ढगे, दरेगाव