शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

ट्रॅप रचण्याचा विचार डोक्यातून काढा, मुंबईला येणारच : मनोज जरांगे पाटील

By विजय मुंडे  | Updated: January 18, 2024 19:53 IST

गावा-गावात याद्याच लावल्या नाहीत तर अर्ज करणार कोण

जालना : अंतरवाली सराटी प्रमाणे ट्रॅप रचण्याचा विचार डोक्यातून काढा. आरक्षण दिले तर आम्ही सरकारवर गुलाल उधळण्यासाठी मुंबईत येवू आणि नाही दिले तर आरक्षण घेण्यासाठी मुंबईला येणार, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. नोंदी आढळलेल्या ५४ लाख लोकांना, त्यांच्या परिवाराला २० जानेवारीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

आ. बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, विभागीय उपायुक्त गव्हाणे यांनी गुरूवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून सगेसोयरे अध्यादेश आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चर्चा केली. मराठवाड्यातील सात हजार गावांतील कागदपत्रांची तपासणी केलीच नाही. ३३/३४ च्या नोंदी तपासण्याची टक्केवारी केवळ ८ टक्के आहे. समिती हैदराबादला गेली. किती पुरावे आणले. राक्षसभुवन संस्थांकडे पुरावे आहेत. ते घेतले नाहीत. देवी लसीच्या पुराव्यांवर कार्यवाही नाही. निजामकालीन गॅझेट वापरले जात नाही. मग आरक्षण मिळणार कसे? दोन दिवसांत ५४ लाख लोकांना आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र द्या असे सांगितले. परंतु, अद्याप याद्याच लावलेल्या नाहीत. सग्या सोयऱ्यांची व्याख्या तीन तीन वेळा बदलता. आता दोन दिवसांत ५४ लाख लोकांना प्रमाणपत्र देणार का ? २२ जानेवारीपर्यंत द्या. आम्ही पुण्यात असू. प्रमाणपत्र दिल्याचा डाटा द्या, आपण सांगितल्याप्रमाणे सगेसोयऱ्यांचा अध्यादेश जारी करा. तेथून गुलालाच्या ट्रक घेवून मुंबईत येवू. सरकारवर गुलाल उधळू असेही जरांगे पाटील म्हणाले.

नाेंदी सापडलेल्यांच्या याद्या लावल्या नाहीतविभागीय आयुक्तांनी पत्र काढले. परंतु, अनेक गावांत नाेंदी सापडलेल्यांच्या याद्याच लावण्यात आलेल्या नाहीत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी काही गावच्या सरपंचांना थेट फोन करून आ. कडू यांच्याशी संवाद साधून दिला. समोरून येणारी उत्तरे पाहता आ. कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. यंत्रणा काम करीत नसेल तर ही चुकीची बाब आहे. काम न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबीत करा, अशा सूचनाच आ. कडू यांनी वरिष्ठांना भ्रमणध्वनीद्वारे दिल्या.

आम्ही येतो २० तारखेलामनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आ. बच्चू कडू यांनी आम्ही येतो २० तारखेला असे म्हणताच उपस्थितांच्या नजरा आ. कडू यांच्याकडे वळाल्या. आपण आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहोत. मागण्या मान्य न झाल्यास समाजासोबत मी ही आंदोलक म्हणून राहणार असल्याचे आ. कडू म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना