शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

ट्रॅप रचण्याचा विचार डोक्यातून काढा, मुंबईला येणारच : मनोज जरांगे पाटील

By विजय मुंडे  | Updated: January 18, 2024 19:53 IST

गावा-गावात याद्याच लावल्या नाहीत तर अर्ज करणार कोण

जालना : अंतरवाली सराटी प्रमाणे ट्रॅप रचण्याचा विचार डोक्यातून काढा. आरक्षण दिले तर आम्ही सरकारवर गुलाल उधळण्यासाठी मुंबईत येवू आणि नाही दिले तर आरक्षण घेण्यासाठी मुंबईला येणार, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. नोंदी आढळलेल्या ५४ लाख लोकांना, त्यांच्या परिवाराला २० जानेवारीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

आ. बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, विभागीय उपायुक्त गव्हाणे यांनी गुरूवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून सगेसोयरे अध्यादेश आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चर्चा केली. मराठवाड्यातील सात हजार गावांतील कागदपत्रांची तपासणी केलीच नाही. ३३/३४ च्या नोंदी तपासण्याची टक्केवारी केवळ ८ टक्के आहे. समिती हैदराबादला गेली. किती पुरावे आणले. राक्षसभुवन संस्थांकडे पुरावे आहेत. ते घेतले नाहीत. देवी लसीच्या पुराव्यांवर कार्यवाही नाही. निजामकालीन गॅझेट वापरले जात नाही. मग आरक्षण मिळणार कसे? दोन दिवसांत ५४ लाख लोकांना आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र द्या असे सांगितले. परंतु, अद्याप याद्याच लावलेल्या नाहीत. सग्या सोयऱ्यांची व्याख्या तीन तीन वेळा बदलता. आता दोन दिवसांत ५४ लाख लोकांना प्रमाणपत्र देणार का ? २२ जानेवारीपर्यंत द्या. आम्ही पुण्यात असू. प्रमाणपत्र दिल्याचा डाटा द्या, आपण सांगितल्याप्रमाणे सगेसोयऱ्यांचा अध्यादेश जारी करा. तेथून गुलालाच्या ट्रक घेवून मुंबईत येवू. सरकारवर गुलाल उधळू असेही जरांगे पाटील म्हणाले.

नाेंदी सापडलेल्यांच्या याद्या लावल्या नाहीतविभागीय आयुक्तांनी पत्र काढले. परंतु, अनेक गावांत नाेंदी सापडलेल्यांच्या याद्याच लावण्यात आलेल्या नाहीत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी काही गावच्या सरपंचांना थेट फोन करून आ. कडू यांच्याशी संवाद साधून दिला. समोरून येणारी उत्तरे पाहता आ. कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. यंत्रणा काम करीत नसेल तर ही चुकीची बाब आहे. काम न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबीत करा, अशा सूचनाच आ. कडू यांनी वरिष्ठांना भ्रमणध्वनीद्वारे दिल्या.

आम्ही येतो २० तारखेलामनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आ. बच्चू कडू यांनी आम्ही येतो २० तारखेला असे म्हणताच उपस्थितांच्या नजरा आ. कडू यांच्याकडे वळाल्या. आपण आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहोत. मागण्या मान्य न झाल्यास समाजासोबत मी ही आंदोलक म्हणून राहणार असल्याचे आ. कडू म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना