शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कर्त्या तरूणाच्या खुनामुळे गवळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:24 IST

पावडे आणि राजपूत यांनी ज्ञानेश्वरला लोखंडी रॉडने मारहाण केली. रॉडचे घाव वर्मी लागल्याने त्यातच ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : गावात दुष्काळी स्थितीमुळे हाताला काम मिळणे अवघड झाल्याने पुणे येथे जाऊन घरासाठी काही तरी करण्यासाठी ज्ञानेश्वरने चक्क हॉटेलमध्ये नोकरी स्वीकारली. ज्ञानेश्वरचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले होते. महिन्यापूर्वी ज्ञानेश्वर अंकुश गवळी हा पुणे येथे कामाच्या शोधात गेला होता. तेथे काम तर मिळालेच परंतु राहण्याची व्यवस्थाही झाल्याने तो खुश होता. पुण्यात कसेतरी आपले बस्तान बसल्याचे तो ज्यावेळी कु टुंबांशी मोबाईलवरून बोलत होता. तेव्हा तो आनंदात होता. थोडे बरे चालले असे सांगून आईला आणि घरातील भाऊ, बहिणीला दिलासा देत होता. परंतु शुक्रवारी रात्री पोलिसांचा फोन आला आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकल्याचे गवळी कुटुंबाने सांगितले.शुक्रवारी ज्ञानेश्वर गवळी हा नेहमीप्रमाणे हॉटेलमधील कामकाज आटोपून हॉटेल मालकाने दिलेल्या खोलीत गेला. परंतु तेथील त्याचे सहकारी अनिकेत मानसिंग राजपूत आणि राजू सखाराम पावडे हे दारू प्यायलेले होते. त्यातच त्या दोघांसोबत ज्ञानेश्वरचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यातून पावडे आणि राजपूत यांनी ज्ञानेश्वरला लोखंडी रॉडने मारहाण केली. रॉडचे घाव वर्मी लागल्याने त्यातच ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी हॉटलमधील चाकूने ज्ञानेश्वरचे शीर धडापासून वेगळे करून तेथून पळ काढला.दुसऱ्या दिवशी हॉटेलचे मालक शेखर बाळासाहेब दिंडे हे सकाळी आले असता त्यांना हॉटलमध्ये नोकर नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी कामगारांसाठी असलेल्या खोलीत जाऊन पाहिले असता, ज्ञानेश्वर गवळीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेचच याची माहिती दिघी पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच पळून गेलेल्या राजपूत आणि पावडेची माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरविली.या दोघांनाही १२ तासांच्या आत पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांनी प्रारंभी ज्ञानेश्वरचा खून केला नसल्याचे सांगितले, परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कबुली दिली. ज्ञानेश्वरचा खून झाल्याने गवळी कुटुंबाला कळल्यावर ज्ञानेश्वरची आई, लहान भाऊ आणि बहीण पुणे येथे गेले. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी ज्ञानेश्वरवर पुण्यातच अंंत्यसंस्कार केले.दुर्दैव म्हणजे ज्ञानेश्वरचे वडील अंकुशराव गवळी यांचे दोन महिन्यापूर्वीच निधन झाले. दोन महिन्यात गवळी कुटुंबावर हा दुसरा आघात असल्याने कुटुंब पूर्णपणे हादरले आहे.वालसावंगी आणि पुण्याचे जमेना ?वालसासावंगी येथील ज्ञानेश्वर गवळीच्या खूनाची घटना ताजी आहे. असे असले तरी यापूर्वी वालसावंगी येथील निखिल तुकाराम कोथळकर हे अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुणे येथे गेला होता. परंतु त्याचाही असाच दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दुसरा एक तरूण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे येथे गेला होता. त्याचा गणपती विसर्जनाच्यावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचे नाव राजकुमार सखाराम गवळी असे आहे. त्यामुळे वालसावंगी आणि पुण्याचे जणू काही वैर आहे की काय, अशी भीती आता वालसावंगीत पसरली आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी