शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

गांधीजी हीच भारताची खरी ओळख...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:36 IST

संपूर्ण जगात भारताची ओळख फक्त गांधीजी हीच आहे. गांधीजी हाच आमचा खरा ब्रँड असल्याचे प्रतिपादन ओडिशा येथील डॉ. विश्वजित रॉय यांनी केले.

जालना : संपूर्ण जगात भारताची ओळख फक्त गांधीजी हीच आहे. गांधीजी हाच आमचा खरा ब्रँड असल्याचे प्रतिपादन ओडिशा येथील डॉ. विश्वजित रॉय यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित १४ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात सकाळच्या सत्रात ‘गांधी कोण होते ?’ या विषयावर ते बोलत होते.ते म्हणाले की, संपूर्ण जगात भारताची ओळख गांधी हीच आहे. जगातील प्रत्येक देशात तेथील गांधी तयार झाले आहेत. अनेक देशांच्या महापुरूषाचे आदर्श गांधी आहेत. गांधी ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. संपूर्ण विश्व या विचाराकडे आशावादी नजरेने पाहत आहे. म्हणूनच युनोने गांधी जयंती विश्वशांती दिवस म्हणून घोषित केला आहे. जगाला आपल्या आचरणातून गांधींनी आदर्श दिला म्हणून मार्टिन ल्यूथर किंंग, बराक ओबामा, आँग-सांस-की अशा किती तरी लोकांचा आदर्श गांधीच आहेत. गांधींनी शत्रूंवरही तेवढेच प्रेम केले, जेवढे मित्रांवर केले. म्हणूनच त्यांना ज्यांनी जास्त त्रास दिला तो जनरल स्मट्स या इंग्रज अधिका-याला गांधींनी भेट दिलेली चप्पल तो पायात न घालता डोक्यावर घेऊन फिरला. गांधींचे जीवन प्रचंड आव्हानात्मक होते. त्यावेळी इंग्रज शत्रू होते; मात्र आज तरूणांसमोर विषमता हे मोठे आव्हान आहे. देशातील वाढत चाललेली आर्थिक विषमता, गरिबी हे संपविण्याचे आव्हान आहे आणि हे गांधी विचारांनी पूर्ण होऊ शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.यावेळी डॉ. उद्धव थोरवे, डॉ. राजक्रांती वलसे, डॉ. प्रतिभा श्रीपत, प्रा. पल्लवी भावसार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. महावीर सदावर्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रवीण चंदनशिवे यांनी मानले.