शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण रखडले

By admin | Updated: July 7, 2014 00:15 IST

शेवगा: अंबड - जालना या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रस्ताव अद्यापही ‘लालफितीत’ असून त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे.

शेवगा: अंबड - जालना या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रस्ताव अद्यापही ‘लालफितीत’ असून त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावर सतत अपघातांच्या घटना घडत आहेत. जालना-अंबड हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अरूंद असल्याने येथे अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी शेगावच्या दिंडीचा अपघात याच मार्गावर झाला होता. त्यात अकरा वारकरी ठार झाले होते. या घटनेनंतर राज्य शासनाने या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. शेवगा परिसरातील रस्त्याची अवस्था फार बिकट बनली असून. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पंखे पूर्णपणे खराब झालेली आहेत. अंबड- जालना रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. तसेच या रस्त्यावर अनेक छोटी-मोठी गावे येत असल्याने ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकतील. मात्र रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्यात येत असल्याने जालना आणि अंबड दोन्ही विभागांकडून दुर्लक्ष होत आहे. शिवाय हा रस्ता जेमतेम ३० कि़मी. आहे. तरीही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने काही दिवसांत हा रस्ता पूर्णत: उखडून जाण्याची भीती वर्तविली जात आहे. काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले होते. मात्र काही दिवसांतच ते खड्डे ‘जैसे थे’ बनले आहेत.त्यामुळे या रस्त्याचे संपूर्ण चौपदरीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. या रस्त्यालगत असणाऱ्या गावातील लोकांची दैनंदिन कामाची व्यवस्था या रस्त्यावरच अवलंबून आहे. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न कायम निकाली काढावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)चौपदरीकरण आवश्यकशहराकडे जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने ग्रामस्थांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दैनंदिन या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर दैनंदिन प्रवाशांची संख्या वाढतच आहे