शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

चौपदरीकरण रखडले

By admin | Updated: July 7, 2014 00:15 IST

शेवगा: अंबड - जालना या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रस्ताव अद्यापही ‘लालफितीत’ असून त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे.

शेवगा: अंबड - जालना या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रस्ताव अद्यापही ‘लालफितीत’ असून त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावर सतत अपघातांच्या घटना घडत आहेत. जालना-अंबड हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अरूंद असल्याने येथे अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी शेगावच्या दिंडीचा अपघात याच मार्गावर झाला होता. त्यात अकरा वारकरी ठार झाले होते. या घटनेनंतर राज्य शासनाने या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. शेवगा परिसरातील रस्त्याची अवस्था फार बिकट बनली असून. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पंखे पूर्णपणे खराब झालेली आहेत. अंबड- जालना रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. तसेच या रस्त्यावर अनेक छोटी-मोठी गावे येत असल्याने ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकतील. मात्र रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्यात येत असल्याने जालना आणि अंबड दोन्ही विभागांकडून दुर्लक्ष होत आहे. शिवाय हा रस्ता जेमतेम ३० कि़मी. आहे. तरीही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने काही दिवसांत हा रस्ता पूर्णत: उखडून जाण्याची भीती वर्तविली जात आहे. काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले होते. मात्र काही दिवसांतच ते खड्डे ‘जैसे थे’ बनले आहेत.त्यामुळे या रस्त्याचे संपूर्ण चौपदरीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. या रस्त्यालगत असणाऱ्या गावातील लोकांची दैनंदिन कामाची व्यवस्था या रस्त्यावरच अवलंबून आहे. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न कायम निकाली काढावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)चौपदरीकरण आवश्यकशहराकडे जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने ग्रामस्थांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दैनंदिन या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर दैनंदिन प्रवाशांची संख्या वाढतच आहे