शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जालना जिल्ह्याला चारशे कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:14 IST

गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा कहर : अहवाल आयुक्तांकडे सादर, सोयाबीन, मका, कपाशीचे नुकसान

जालना : आधी पाऊस पडावा म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना याच परतीच्या पावसाने डोळ्यात अश्रू आणले ओहत. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवाला आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे सुपूर्द केला असून, त्यात सोयाबीनसह. मका, कपाशीसह द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याचे दर्शविले आहे.३१ आक्टोबरला संपलेल्या पावसाळ्यात केवळ ५८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यातही भोकरदन आणि जाफराबाद हे दोन तालुके वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. परंतु दसरा ते दिवाळी आणि त्या नंतर पडलेल्या परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. सोयाबीन, मका आता बाजारात नेऊन त्याचे पैसे होतील असे स्पप्न पाहणाºया शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पंचनामे होऊन नुकसान भरपाईचे क्षेत्र आणि आकडे निश्चित झाले आहेत. ही आकडेवारी जुन्याच निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे यात वाढ झाल्यासच खºया अर्थाने शेतकºयांना मदत मिळू शकते. सध्या आपत्तीच्या जुन्याच निकषानुसार मदतीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. हे पंचनाम्यांचे आकडे तयार करतांना महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची खºया अर्थाने कसोटी लागली. दोनवेळेस बैठका घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना अहवालाची माहिती आणि एक प्रत देण्यात आली. त्यावेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी रणदिवे आदींची उपस्थिती होती.सत्तासंघर्ष : मदतीकडे लक्ष लागूनजालना जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवालही शासनाकडे गेला आहे. परंतु सध्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या गंभीर प्रश्नावर लक्ष देण्यासासाठी ना सत्ताधाºयांना वेळ आहे,ना विरोधकांना त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरच काही अधिकाºयांनी शेतकºयांबद्दल तळमळ दाखवली तरच ही मदत लवकर मिळू श्कते. नसता, मदत प्रत्यक्षात कधी मिळेल याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र