शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

जालना जिल्ह्याला चारशे कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:14 IST

गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा कहर : अहवाल आयुक्तांकडे सादर, सोयाबीन, मका, कपाशीचे नुकसान

जालना : आधी पाऊस पडावा म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना याच परतीच्या पावसाने डोळ्यात अश्रू आणले ओहत. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवाला आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे सुपूर्द केला असून, त्यात सोयाबीनसह. मका, कपाशीसह द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याचे दर्शविले आहे.३१ आक्टोबरला संपलेल्या पावसाळ्यात केवळ ५८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यातही भोकरदन आणि जाफराबाद हे दोन तालुके वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. परंतु दसरा ते दिवाळी आणि त्या नंतर पडलेल्या परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. सोयाबीन, मका आता बाजारात नेऊन त्याचे पैसे होतील असे स्पप्न पाहणाºया शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पंचनामे होऊन नुकसान भरपाईचे क्षेत्र आणि आकडे निश्चित झाले आहेत. ही आकडेवारी जुन्याच निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे यात वाढ झाल्यासच खºया अर्थाने शेतकºयांना मदत मिळू शकते. सध्या आपत्तीच्या जुन्याच निकषानुसार मदतीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. हे पंचनाम्यांचे आकडे तयार करतांना महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची खºया अर्थाने कसोटी लागली. दोनवेळेस बैठका घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना अहवालाची माहिती आणि एक प्रत देण्यात आली. त्यावेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी रणदिवे आदींची उपस्थिती होती.सत्तासंघर्ष : मदतीकडे लक्ष लागूनजालना जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवालही शासनाकडे गेला आहे. परंतु सध्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या गंभीर प्रश्नावर लक्ष देण्यासासाठी ना सत्ताधाºयांना वेळ आहे,ना विरोधकांना त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरच काही अधिकाºयांनी शेतकºयांबद्दल तळमळ दाखवली तरच ही मदत लवकर मिळू श्कते. नसता, मदत प्रत्यक्षात कधी मिळेल याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र