शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्याला चारशे कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:14 IST

गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा कहर : अहवाल आयुक्तांकडे सादर, सोयाबीन, मका, कपाशीचे नुकसान

जालना : आधी पाऊस पडावा म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना याच परतीच्या पावसाने डोळ्यात अश्रू आणले ओहत. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवाला आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे सुपूर्द केला असून, त्यात सोयाबीनसह. मका, कपाशीसह द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याचे दर्शविले आहे.३१ आक्टोबरला संपलेल्या पावसाळ्यात केवळ ५८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यातही भोकरदन आणि जाफराबाद हे दोन तालुके वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. परंतु दसरा ते दिवाळी आणि त्या नंतर पडलेल्या परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. सोयाबीन, मका आता बाजारात नेऊन त्याचे पैसे होतील असे स्पप्न पाहणाºया शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पंचनामे होऊन नुकसान भरपाईचे क्षेत्र आणि आकडे निश्चित झाले आहेत. ही आकडेवारी जुन्याच निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे यात वाढ झाल्यासच खºया अर्थाने शेतकºयांना मदत मिळू शकते. सध्या आपत्तीच्या जुन्याच निकषानुसार मदतीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. हे पंचनाम्यांचे आकडे तयार करतांना महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची खºया अर्थाने कसोटी लागली. दोनवेळेस बैठका घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना अहवालाची माहिती आणि एक प्रत देण्यात आली. त्यावेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी रणदिवे आदींची उपस्थिती होती.सत्तासंघर्ष : मदतीकडे लक्ष लागूनजालना जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवालही शासनाकडे गेला आहे. परंतु सध्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या गंभीर प्रश्नावर लक्ष देण्यासासाठी ना सत्ताधाºयांना वेळ आहे,ना विरोधकांना त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरच काही अधिकाºयांनी शेतकºयांबद्दल तळमळ दाखवली तरच ही मदत लवकर मिळू श्कते. नसता, मदत प्रत्यक्षात कधी मिळेल याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र