शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वन विभागास अस्वलाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:01 IST

वनविभागाने दोन दिवस अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : दोन दिवसांपूर्वी भोकरदन व फत्तेपूर येथे अस्वलाने हल्ला करून तीन जणांना जखमी केल्यानंतर अस्वलाचा शोध घेण्यासाठी दाखल झालेल्या वनविभागाने दोन दिवस या अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र २१ र्माच रोजी दुपारी २ वाजे पर्यंत अस्वलाचा शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली. अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीना वनविभागाच्या वतीने औषधोपचारासाठी प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजाराचे धनादेश दिले.२० मार्च रोजी शहरात व फत्तेपूर शिवारात अस्वलाने अचानक येऊन नागरीकावर हल्ला केला. जंगलातून भरकटलेले हे अस्वल शहरातील धनगरवाडी शिवारात आले होते, त्याने आकाश सपकाळ वय १७ वर्ष याच्यावर अचानक झडप घालून त्याला जखमी केले. त्यानंतर नागरीकानी अस्वलाला हुसकाऊन लावल्याने हे अस्वल जोमाळा व फत्तेपूर शिवारात गेले फत्तेपूर शिवारातील गणेश गायकवाड यांच्या गट क्रमांक ३५ मधील शेतात शुभम संजय गायकवाड यांच्यावर हल्ला करून जखमी केले, तर याच गावातील सारंगधर तळेकर यांच्या गट क्रमांक १६९ या शेतात हौदाजवळ उभ्या असलेल्या रूख्मणबाई सारंगधर तळेकर यांच्यावर हल्ला करून पळ काढला. मात्र याच वेळी गावातील शंभर ते दीडशे नागरीक या अस्वलाचा पाठलाग करीत होते, त्यामुळे हे अस्वल मिळेल त्या दिशेने पळत होते. अस्वलाला पकडण्यासाठी वनविभागाचे १८ कर्मचाऱ्यांचे पथक आले होते, त्यांनी अस्वल पकडण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले. बुधवारी जालना येथील सहायक वनसंरक्षक जी़एम़शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन जखमीची विचारपूस करून मदतीचे धनादेश दिले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय दोडके वनपाल डी़सी़जाधव, एस़जी़ गाडेकर यांची उपस्थिती होती.अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिन्ही जखमीचा पूर्ण खर्च वनविभाग करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी नमूद केले.भोकरदन व फत्तेपूर शिवारात अस्वलाने हल्ला करून तीन जणाना जखमी केल्यामुळे दोन दिवसा पासून भोकरदन शहरासह फत्तेपूर, गारखेडा, जोमाळा, मासनपूर, चौ-हाळा, बाभुळगाव, कोदोली या गावात अस्वलाने चांगलीच दहशत निर्माण केली होती. २१ मार्च रोजी या सात गावातील शेतकरी अथवा शेतमजुर शेताकडे फिरकलाच नाही जणावराना चारा पाणी करण्यासाठी सुध्दा चार ते पाच जणाच्या जथ्थ्याने जात होते.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी