शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

वन विभागास अस्वलाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:01 IST

वनविभागाने दोन दिवस अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : दोन दिवसांपूर्वी भोकरदन व फत्तेपूर येथे अस्वलाने हल्ला करून तीन जणांना जखमी केल्यानंतर अस्वलाचा शोध घेण्यासाठी दाखल झालेल्या वनविभागाने दोन दिवस या अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र २१ र्माच रोजी दुपारी २ वाजे पर्यंत अस्वलाचा शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली. अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीना वनविभागाच्या वतीने औषधोपचारासाठी प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजाराचे धनादेश दिले.२० मार्च रोजी शहरात व फत्तेपूर शिवारात अस्वलाने अचानक येऊन नागरीकावर हल्ला केला. जंगलातून भरकटलेले हे अस्वल शहरातील धनगरवाडी शिवारात आले होते, त्याने आकाश सपकाळ वय १७ वर्ष याच्यावर अचानक झडप घालून त्याला जखमी केले. त्यानंतर नागरीकानी अस्वलाला हुसकाऊन लावल्याने हे अस्वल जोमाळा व फत्तेपूर शिवारात गेले फत्तेपूर शिवारातील गणेश गायकवाड यांच्या गट क्रमांक ३५ मधील शेतात शुभम संजय गायकवाड यांच्यावर हल्ला करून जखमी केले, तर याच गावातील सारंगधर तळेकर यांच्या गट क्रमांक १६९ या शेतात हौदाजवळ उभ्या असलेल्या रूख्मणबाई सारंगधर तळेकर यांच्यावर हल्ला करून पळ काढला. मात्र याच वेळी गावातील शंभर ते दीडशे नागरीक या अस्वलाचा पाठलाग करीत होते, त्यामुळे हे अस्वल मिळेल त्या दिशेने पळत होते. अस्वलाला पकडण्यासाठी वनविभागाचे १८ कर्मचाऱ्यांचे पथक आले होते, त्यांनी अस्वल पकडण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले. बुधवारी जालना येथील सहायक वनसंरक्षक जी़एम़शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन जखमीची विचारपूस करून मदतीचे धनादेश दिले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय दोडके वनपाल डी़सी़जाधव, एस़जी़ गाडेकर यांची उपस्थिती होती.अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिन्ही जखमीचा पूर्ण खर्च वनविभाग करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी नमूद केले.भोकरदन व फत्तेपूर शिवारात अस्वलाने हल्ला करून तीन जणाना जखमी केल्यामुळे दोन दिवसा पासून भोकरदन शहरासह फत्तेपूर, गारखेडा, जोमाळा, मासनपूर, चौ-हाळा, बाभुळगाव, कोदोली या गावात अस्वलाने चांगलीच दहशत निर्माण केली होती. २१ मार्च रोजी या सात गावातील शेतकरी अथवा शेतमजुर शेताकडे फिरकलाच नाही जणावराना चारा पाणी करण्यासाठी सुध्दा चार ते पाच जणाच्या जथ्थ्याने जात होते.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी