शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागास अस्वलाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:01 IST

वनविभागाने दोन दिवस अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : दोन दिवसांपूर्वी भोकरदन व फत्तेपूर येथे अस्वलाने हल्ला करून तीन जणांना जखमी केल्यानंतर अस्वलाचा शोध घेण्यासाठी दाखल झालेल्या वनविभागाने दोन दिवस या अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र २१ र्माच रोजी दुपारी २ वाजे पर्यंत अस्वलाचा शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली. अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीना वनविभागाच्या वतीने औषधोपचारासाठी प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजाराचे धनादेश दिले.२० मार्च रोजी शहरात व फत्तेपूर शिवारात अस्वलाने अचानक येऊन नागरीकावर हल्ला केला. जंगलातून भरकटलेले हे अस्वल शहरातील धनगरवाडी शिवारात आले होते, त्याने आकाश सपकाळ वय १७ वर्ष याच्यावर अचानक झडप घालून त्याला जखमी केले. त्यानंतर नागरीकानी अस्वलाला हुसकाऊन लावल्याने हे अस्वल जोमाळा व फत्तेपूर शिवारात गेले फत्तेपूर शिवारातील गणेश गायकवाड यांच्या गट क्रमांक ३५ मधील शेतात शुभम संजय गायकवाड यांच्यावर हल्ला करून जखमी केले, तर याच गावातील सारंगधर तळेकर यांच्या गट क्रमांक १६९ या शेतात हौदाजवळ उभ्या असलेल्या रूख्मणबाई सारंगधर तळेकर यांच्यावर हल्ला करून पळ काढला. मात्र याच वेळी गावातील शंभर ते दीडशे नागरीक या अस्वलाचा पाठलाग करीत होते, त्यामुळे हे अस्वल मिळेल त्या दिशेने पळत होते. अस्वलाला पकडण्यासाठी वनविभागाचे १८ कर्मचाऱ्यांचे पथक आले होते, त्यांनी अस्वल पकडण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले. बुधवारी जालना येथील सहायक वनसंरक्षक जी़एम़शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन जखमीची विचारपूस करून मदतीचे धनादेश दिले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय दोडके वनपाल डी़सी़जाधव, एस़जी़ गाडेकर यांची उपस्थिती होती.अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिन्ही जखमीचा पूर्ण खर्च वनविभाग करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी नमूद केले.भोकरदन व फत्तेपूर शिवारात अस्वलाने हल्ला करून तीन जणाना जखमी केल्यामुळे दोन दिवसा पासून भोकरदन शहरासह फत्तेपूर, गारखेडा, जोमाळा, मासनपूर, चौ-हाळा, बाभुळगाव, कोदोली या गावात अस्वलाने चांगलीच दहशत निर्माण केली होती. २१ मार्च रोजी या सात गावातील शेतकरी अथवा शेतमजुर शेताकडे फिरकलाच नाही जणावराना चारा पाणी करण्यासाठी सुध्दा चार ते पाच जणाच्या जथ्थ्याने जात होते.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी