शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

कोरोना राेखण्यासाठी शिस्त पाळा.. अन्यथा दंडाचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST

गेल्या महिन्यापासून कोरोनाने हळू-हळू आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण घटल्याने तो हद्दपार झाला, या अविर्भावात ...

गेल्या महिन्यापासून कोरोनाने हळू-हळू आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण घटल्याने तो हद्दपार झाला, या अविर्भावात आपण सर्वजण होतो. परंतु हा समज खोटा ठरवत कोरोनाची दुसरी लाट सक्रिय झाली आहे. त्याला आपण सर्वजण जबाबदार असून, गर्दी टाळण्याऐवजी सर्चच सोहळे धूमधडाक्यात होत आहेत. त्याचा परिणाम पुन्हा एकदा नव्याने रुग्णवाढीवर होत आहे. गर्दीसह वातावरणातील अचानक झालेला बदलदेखील या कोरोना वृद्धीसाठी पोषक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला असेल तर ही बाब गंभीरतेने घेऊन लगेचच स्वत:ची कोरोना चाचणी करून घेण्याकडे कल असण्याऐवजी ती टाळण्याकडे नागरिकांचा ओढा जास्त असल्याने मध्यंतरी चाचण्यांची संख्या ही रोडावली होती; परंतु आता रुग्णवाढीमुळे संशयितांची चाचणी आता करणे अनिवार्य केले आहे. विशेष म्हणजे पूर्वी ज्याप्रमाणे प्रभागात जाऊन आरोग्य कर्मचारी तपासणी करत होते. ते आता करणे शक्य नसले तरी सर्दी आणि तापाच्या रुग्णांनी दुर्लक्ष हे त्यांच्यासह त्यांच्या परिवारासाठी देखील गंभीर ठरू शकते. या बैठकीस पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, निवासी उपजिल्हािकारी केशव नेअके, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह डॉ. कडले आणि अन्य विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

दहावी, बारावीवे वर्ग सुरू राहणार

आज झालेल्या आपत्ती निवारण बैठकीत दहावी आणि बारावीचे वर्ग परीक्षा असल्याने ते सुरू ठेवण्यावर निर्णय झाला. परंतु तेथे देखील कोराना होऊ नये म्हणून सर्व निकष आणि बंधने पाळणे गरजेचे आहे. अन्य शाळा, खासगी कोचिंग क्लासेस हे ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे निर्देश आहेत. यासह आठवडी बाजार, यात्रा रद्द करण्यात आल्या असून, आंदोलन, मोर्चे रद्द केले आहेत.

चौकट

विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड

घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क लावून पडावे. यासाठी जालना शहरासह जिल्ह्यातील लहान-मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जालन्यात अशी दहा पथके राहणार असून, त्यात शिक्षक, पोलीस कर्मचारी आणि जालना पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. सुरक्षित अंतर न पाळल्यास २०० रुपये तर विनामास्क फिरताना आढळल्यास ५०० रुपये दंड म्हणून वसूल करावेत, असे निर्देश बिनवडे यांनी दिले आहेत. या सर्व नियमांची अंमलबजावणी ही बुधवारपासून अंमलात येणार आहे.