शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

अवैध नळजोडण्या नियमित करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

शहरातील अवैध नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीचा रेटा तसेच महसूल वाढीच्या दृष्टिने अधिकृत नळ जोडणीची संख्या वाढविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अवैध जोडणी नियमित करण्यावर भर दिला जात आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील अवैध नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीचा रेटा तसेच महसूल वाढीच्या दृष्टिने अधिकृत नळ जोडणीची संख्या वाढविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अवैध जोडणी नियमित करण्यावर भर दिला जात आहे.शहरातील विविध भागांत असलेल्या अवैध नळ जोडण्या हा पालिकेसाठी अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरत आहे. त्यातच एकाच घरात दोन दोन नळजोडण्या असून, अनेकवेळा याविरोधात पालिका प्रशासनाकडून मोहीमही उघडण्यात आली पण स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावामुळे याला यश येऊ शकलेले नाही. त्यातच पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याने मुलभूत सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. यावर तोडगा काढत पालिकेने अवैध नळजोडण्या दंड आकारुन वैध करण्यावर भर देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पालिकेच्या पथकाकडून दोन महिन्यांत ४०० पेक्षा अधिक जोडण्या अधिकृत करण्यात आल्या असल्या तरी भविष्यात पाणी कर किती नागरिक भरतात यावर या मोहिमेचे यश अवलंबून आहे. वैध नळजोडण्यांपेक्षा अवैध नळजोडण्यांची संख्या तब्बल तिप्पट असल्याचे मालमत्तांच्या संख्येवरुन दिसून येते.नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे एकूण ४४ हजार मालमत्तांची नोंद असून, नवीन मुल्यांकनानुसार सुमारे २५ हजारांवर मालमत्तांची वाढ झाली आहे. असे असताना वैध नळ जोडण्यांची संख्या अत्यंत कमी आहे. पाणीपुरवठा विभागाकडे १८ हजार आणि मालमत्ता विभागाकडे सुमारे २२ हजार नळ जोडण्या असल्याची नोंद आहे. शहरातील बहुतांश भागांत अवैध नळ जोडण्या मोठ्या प्रमाणात आहे. कन्हैय्यानगर, लोधीमोहल्ला, दुखीनगर, सुंदरनगर, चंदनझिरा, शेरसवारनगर, शंकरनगर, लालबाग, गांधीनगर या भागात अवैध नळ जोडण्यांची प्रमाण अधिक आहे. काहींनी घरगुती वापराबरोबरच व्यावसायिक कामांसाठी चक्क मुख्य जलवाहिनीवर अवैध नळ जोडण्यात घेतल्याचे तपासणीत समोर आले आहे. अंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू झाल्यानंतर अवैध नळ जोडण्यांची शोध मोहीम पालिकेने हाती घेतली. यासाठी नवीन जालना व जुना जालना, अशी दोन स्वतंत्रे पथकेही तयार करण्यात आली.मात्र, पथकाने पाणीचोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याऐवजी दंडात्मक रक्कम व एका वर्षाची पाणीपट्टी आकारुन अवैध जोडण्या नियमित करण्याचे धोरण अवलंबले आहे.मागील दोन महिन्यांत चारशेहून अधिक अवैध जोडण्यात नियिमित करण्यात आल्या असून, सुमारे १४ लाखांची वसुली करण्यात आली आहे. मात्र, एकूण अवैध नळजोडण्यांचा विचार करता ही कासवगतीच असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे वर्षानुवर्षे पाणी चोरी करणाºयांना नाममात्र दंड आकारला जात असल्याने नियमितपणे पाणीपट्टी भरणाºयांवर एक प्रकारे हा अन्यायच असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालना