शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात उत्पादन घटल्याने डाळींच्या भावामध्ये चढउतार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:14 IST

बाजारगप्पा : जालना बाजारपेठेतील डाळींमधील तेजी कमी होण्याचे नाव घेत नसली तरी, ज्वारीसह उडदाच्या डाळीत अनुक्रमे ३०० आणि ४०० रुपयांची घसरण झाली आहे

- संजय देशमुख

जालना बाजारपेठेतील डाळींमधील तेजी कमी होण्याचे नाव घेत नसली तरी, ज्वारीसह उडदाच्या डाळीत अनुक्रमे ३०० आणि ४०० रुपयांची घसरण झाली आहे. असे असले तरी सोयाबीनमध्ये ५० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. सोयाबीनची आवकही गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३ हजार क्विंटलने कमी झाली आहे. 

सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येत्या काही महिन्यांमध्ये चांगली मागणी राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणणे थांबविले असल्याचे सांगण्यात आले. सोयाबीनच्या पेंडेला मागणी असल्याने त्याचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर सोयाबीन हे पीक आहे. दुष्काळ असला तरी सोयाबीनच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आता दिवाळी संपल्याने जालना बाजारपेठेत किराणा मालामध्ये फारसा उठाव नसल्याचे चित्र आहे. पोहे, मुरमुरे यांच्या दरात घसरण झाली आहे. पोह्यामध्ये ५०० रुपयांची घट ही विक्रमी मानली जाते. साखर ‘जैसे थे’ आहे. ३,२०० ते ३,२८० एवढा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत साखरेच्या दरात क्विंटलमागे ५० रुपयांची घट झाली आहे. गुळाची आवकही जालना बाजारपेठेत तीन हजार भेली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले. उडदाच्या डाळीमध्ये कधी घसरण, तर कधी अचानक तेजी येत आहे.

आठवड्याच्या प्रारंभी या डाळीत ४०० रुपयांची घट झाली होती, तर आठवडा सरतेशेवटी या डाळीच्या दरात चक्क १ हजार रुपये क्विंटलमागे वाढले आहेत. चना डाळीमध्ये ६,००० ते ६,२०० रुपये भाव कायम असून, यातही भावामध्ये चढ-उतार कायम आहे. आठवड्याच्या सरतेशेवटी तुरीमध्ये १ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

मुगाची डाळ ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत असून, यामध्ये ७०० रुपयांची वाढ झाली आहे. मक्याची आवक ३ हजार क्विंटल असली तरी याचे भाव पाहिजे तेवढे वाढलेले नाहीत. सध्या मक्याला प्रतिक्विंटल १,३०० ते १,४५० रुपये भाव मिळत आहे. पोल्ट्री उद्योगासाठी मका आणि सोयाबीनची मागणी वाढल्याने हे दर भविष्यात कमी-जास्त होतील, असे सांगण्यात आले. 

ज्वारीला मोठी मागणी आहे. दररोज ५०० ते ७०० पोती ज्वारीची आवक असून, यामध्ये मात्र ३०० रुपयांची घट झाली आहे. सध्या ज्वारीला २,५०० ते ३,२०० रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. कडधान्यामध्ये तेजी ही आगामी काळातही कायम राहील, असे चित्र आहे. पाऊस कमी झाल्याने यंदा डाळींचे उत्पादन गतवर्षीच्या तुलतेन घटल्याने हे भाव वाढत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

दिवाळी संपल्यानंतर आता कापसाची खरेदी करण्यासाठी सीसीआयकडून प्रयत्न सुरू झाले आहेत; परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस हा गुजरात आणि आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांना मिळेल त्या किमतीत विकला आहे. या व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कापूस खरेदी केला. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी