शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पंधरा लाख मतदार निवडणार पाच आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:21 IST

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधासभेच्या निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार आहेत. शुक्रवापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, चार आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.हे अर्ज त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय कार्यालयात स्वीकारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. या निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. २७ संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.जालना जिल्ह्यात जालना, अंबड, बदनापूर, घनसावंगी आणि भोकरदन असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार असल्याचे बिनवडे म्हणाले. जवळपास एक हजार ६५३ मतदान केंदे्र आहेत. त्यातील २७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज्ज असून, जवळपास एक हजार १८३ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून, ४०० पेक्षा अधिक गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाईल.संवेदनशील केंद्रांवर शस्त्रधारी जवानसंवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांमधील शस्त्रधारी जवान तैनात करण्यात येणार असल्याचे अधीक्षक चैतन्य म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून, काही जणांना हद्दपारही केले आहे. या पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह अन्य विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगvidhan sabhaविधानसभाJalna Policeजालना पोलीस