शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

पंधरा लाख मतदार निवडणार पाच आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:21 IST

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधासभेच्या निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार आहेत. शुक्रवापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, चार आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.हे अर्ज त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय कार्यालयात स्वीकारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. या निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. २७ संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.जालना जिल्ह्यात जालना, अंबड, बदनापूर, घनसावंगी आणि भोकरदन असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार असल्याचे बिनवडे म्हणाले. जवळपास एक हजार ६५३ मतदान केंदे्र आहेत. त्यातील २७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज्ज असून, जवळपास एक हजार १८३ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून, ४०० पेक्षा अधिक गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाईल.संवेदनशील केंद्रांवर शस्त्रधारी जवानसंवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांमधील शस्त्रधारी जवान तैनात करण्यात येणार असल्याचे अधीक्षक चैतन्य म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून, काही जणांना हद्दपारही केले आहे. या पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह अन्य विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगvidhan sabhaविधानसभाJalna Policeजालना पोलीस