शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पंधरा लाख मतदार निवडणार पाच आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:21 IST

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधासभेच्या निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार आहेत. शुक्रवापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, चार आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.हे अर्ज त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय कार्यालयात स्वीकारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. या निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. २७ संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.जालना जिल्ह्यात जालना, अंबड, बदनापूर, घनसावंगी आणि भोकरदन असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार असल्याचे बिनवडे म्हणाले. जवळपास एक हजार ६५३ मतदान केंदे्र आहेत. त्यातील २७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज्ज असून, जवळपास एक हजार १८३ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून, ४०० पेक्षा अधिक गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाईल.संवेदनशील केंद्रांवर शस्त्रधारी जवानसंवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांमधील शस्त्रधारी जवान तैनात करण्यात येणार असल्याचे अधीक्षक चैतन्य म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून, काही जणांना हद्दपारही केले आहे. या पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह अन्य विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगvidhan sabhaविधानसभाJalna Policeजालना पोलीस