शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

चार राज्यात पाच दिवस फिरून महिलेसह दोन मुलांचा लावला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

जालना : चंदनझिरा परिसरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या महिलेसह दोन मुलांना चंदनझिरा पोलिसांनी चार राज्यांत पाच दिवस ...

जालना : चंदनझिरा परिसरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या महिलेसह दोन मुलांना चंदनझिरा पोलिसांनी चार राज्यांत पाच दिवस फिरून १४०० किलोमीटर दूर असलेल्या मध्यप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून शोधून आणले. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

एक २७ वर्षीय विवाहित महिला ८ मे रोजी तिच्या दोन मुलांसह घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शिवाय, महिलेचा पती शेख हसन याने आपल्या पत्नीचा घातपात झाल्याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी या प्रकरणी लक्ष घालून, पथक तयार करून महिलेच्या शोधासाठी पाठविले. सदरील महिला ही मुंबई येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथे जाऊन महिलेचे नातलग तसेच ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. परंतु, येथे पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही. याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, सदरील महिलेच्या घराशेजारीच दिल्ली येथे एक जोडपे राहत होते. ते सहा महिन्यांपासून मुंबई सोडून दिल्ली येथे गेले असून, त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर नसल्याचे समजले. तोच धागा पकडून पोलिसांनी हरियाणा, राजस्थानमार्गे दिल्ली गाठली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. या वेळीच सदरील महिला ही मध्यप्रदेशातील बागपत जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक लोकांना फोटो दाखवून महिला व मुलांचा शोध सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान, सदरील महिला व दोन्ही मुले पोलिसांना मिळाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, एएसआय कांबळे, पोलीस अंमलदार गोपाल दिलवाले, पोलीस अंमलदार अनिल काळे, श्रद्धा गायकवाड, आदींनी केली.

पतीच्या त्रासाला कंटाळून केले पलायन

पोलिसांनी सदरील महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्या महिलेेने सांगितले की, माझा पती मला नेहमी क्षुल्लक कारणावरून विनाकारण शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येत होते. परंतु, मी माझ्या दोन्ही मुलांसाठी माझ्या ओळखीच्या महिलेकडे राहण्यासाठी गेले होते.