शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

चार राज्यात पाच दिवस फिरून महिलेसह दोन मुलांचा लावला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

जालना : चंदनझिरा परिसरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या महिलेसह दोन मुलांना चंदनझिरा पोलिसांनी चार राज्यांत पाच दिवस ...

जालना : चंदनझिरा परिसरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या महिलेसह दोन मुलांना चंदनझिरा पोलिसांनी चार राज्यांत पाच दिवस फिरून १४०० किलोमीटर दूर असलेल्या मध्यप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून शोधून आणले. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

एक २७ वर्षीय विवाहित महिला ८ मे रोजी तिच्या दोन मुलांसह घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शिवाय, महिलेचा पती शेख हसन याने आपल्या पत्नीचा घातपात झाल्याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी या प्रकरणी लक्ष घालून, पथक तयार करून महिलेच्या शोधासाठी पाठविले. सदरील महिला ही मुंबई येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथे जाऊन महिलेचे नातलग तसेच ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. परंतु, येथे पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही. याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, सदरील महिलेच्या घराशेजारीच दिल्ली येथे एक जोडपे राहत होते. ते सहा महिन्यांपासून मुंबई सोडून दिल्ली येथे गेले असून, त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर नसल्याचे समजले. तोच धागा पकडून पोलिसांनी हरियाणा, राजस्थानमार्गे दिल्ली गाठली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. या वेळीच सदरील महिला ही मध्यप्रदेशातील बागपत जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक लोकांना फोटो दाखवून महिला व मुलांचा शोध सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान, सदरील महिला व दोन्ही मुले पोलिसांना मिळाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, एएसआय कांबळे, पोलीस अंमलदार गोपाल दिलवाले, पोलीस अंमलदार अनिल काळे, श्रद्धा गायकवाड, आदींनी केली.

पतीच्या त्रासाला कंटाळून केले पलायन

पोलिसांनी सदरील महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्या महिलेेने सांगितले की, माझा पती मला नेहमी क्षुल्लक कारणावरून विनाकारण शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येत होते. परंतु, मी माझ्या दोन्ही मुलांसाठी माझ्या ओळखीच्या महिलेकडे राहण्यासाठी गेले होते.