शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

चार राज्यात पाच दिवस फिरून महिलेसह दोन मुलांचा लावला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

जालना : चंदनझिरा परिसरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या महिलेसह दोन मुलांना चंदनझिरा पोलिसांनी चार राज्यांत पाच दिवस ...

जालना : चंदनझिरा परिसरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या महिलेसह दोन मुलांना चंदनझिरा पोलिसांनी चार राज्यांत पाच दिवस फिरून १४०० किलोमीटर दूर असलेल्या मध्यप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून शोधून आणले. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

एक २७ वर्षीय विवाहित महिला ८ मे रोजी तिच्या दोन मुलांसह घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शिवाय, महिलेचा पती शेख हसन याने आपल्या पत्नीचा घातपात झाल्याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी या प्रकरणी लक्ष घालून, पथक तयार करून महिलेच्या शोधासाठी पाठविले. सदरील महिला ही मुंबई येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथे जाऊन महिलेचे नातलग तसेच ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. परंतु, येथे पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही. याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, सदरील महिलेच्या घराशेजारीच दिल्ली येथे एक जोडपे राहत होते. ते सहा महिन्यांपासून मुंबई सोडून दिल्ली येथे गेले असून, त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर नसल्याचे समजले. तोच धागा पकडून पोलिसांनी हरियाणा, राजस्थानमार्गे दिल्ली गाठली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. या वेळीच सदरील महिला ही मध्यप्रदेशातील बागपत जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक लोकांना फोटो दाखवून महिला व मुलांचा शोध सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान, सदरील महिला व दोन्ही मुले पोलिसांना मिळाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, एएसआय कांबळे, पोलीस अंमलदार गोपाल दिलवाले, पोलीस अंमलदार अनिल काळे, श्रद्धा गायकवाड, आदींनी केली.

पतीच्या त्रासाला कंटाळून केले पलायन

पोलिसांनी सदरील महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्या महिलेेने सांगितले की, माझा पती मला नेहमी क्षुल्लक कारणावरून विनाकारण शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येत होते. परंतु, मी माझ्या दोन्ही मुलांसाठी माझ्या ओळखीच्या महिलेकडे राहण्यासाठी गेले होते.