शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गोठ्याला आग, बारा शेळ्यांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:17 IST

अंबड तालुक्यातील एकनाथनगर येथील एक पत्र्याचे घर व गोठ्याला शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील बारा शेळ्यांसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला.

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील एकनाथनगर येथील एक पत्र्याचे घर व गोठ्याला शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील बारा शेळ्यांसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.वडीगोद्री येथील शेतकरी पांडुरंग रामचंद्र काळे यांचे वडीगोद्री-धाकलगाव शिवारात पत्र्याचे घर व घराला लागून गोठा आहे. गोठ्यात ३२ शेळ्या बांधलेल्या होत्या. तसेच एक म्हशीचे वासरूही होते.पहाटे चार वाजेच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. त्यामुळे शेळ्यांचा आवाज आल्याने पांडुरंग काळे, त्यांच्या पत्नी, सुलभा, मुली श्रद्धा व पल्लवी यांना जाग आली. घराला लागूनच गोठा असल्याने सर्व जण बाहेर पळाले. काळे यांनी आरडाओरड केळ्यामुळे शेजारी धावत आले. त्यांनी शेजा-यांच्या मदतीने वीस शेळ्यांचा जीव वाचवला. मात्र, १२ शेळ्या व एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत काळे यांचे दीड लाखाचे नुकसान झाले. घर जळाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला. तलाठी एन.एन. पठाण यांनी पंचनामा केला.