शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

अखेर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या सूचना - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम : जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने ...

‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम :

जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. परंतु, प्रशासनाकडून कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात नसल्याचे समोर आले होते. याबाबत ‘लोकमत’ने ३ एप्रिलच्या अंकात ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर : पॉझिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचणीकडे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज ४५० ते ५०० रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, नागरिक नियमांकडे कानाडोळा करीत आहेत. दुसरीकडे प्रशासनाचाही हलगर्जीपणा दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात नाही. प्रशासनाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर पडल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वेळी टोपे म्हणाले, कोरोनाबाधितांच्या संपर्कामधील सहवासीतांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील २० व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. कोरोनाबाधितांच्या सहवासीतांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीने काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी या वेळी दिले.