शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

गाळमुक्त अभियानात भोकरदनला झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:34 IST

मृदा व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील दीडशे तलावांमधील गाळ काढण्यात येणार आहे.

जालना : मृदा व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील दीडशे तलावांमधील गाळ काढण्यात येणार आहे. यात भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक ४५, तर त्याखालोखाल जाफराबाद तालुक्यातील २२ तलावांचा समावेश आहे. तलावांमधील पाणी कमी झाल्यानंतर गाळ काढण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे.शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागांतर्गत मागील वर्षांपासून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. पाझर तलाव, लघु तलाव गाळमुक्त होऊन त्यातील पाणीसाठवण क्षमता वाढावी, तसेच धरणांमधील सुपीक गाळ शेतक-यांना शेतीसाठी उपयोगी पडावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गत वर्षी जाफराबाद तालुक्यातील शिंदी गावातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली होती. वर्ष २०१७-१८ साठी अभियानांतर्गत १५० गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक ४५, जाफराबादमधील २२ तर घनसावंगी तालुक्यातील सर्वात कमी नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या तलावांमध्ये पाणी आहे. उन्हाळ्यात पाणी आटण्यास सुरुवात झाल्यानंतर मार्च ते मे या तीन महिन्यात सुमारे १. ५० लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन जलसंधारण विभागाने केले आहे. लोकसहभाग मिळाल्यास यात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.----------मागील वर्षी ९८ तलावात कामलघु सिंचन जलसंधारण, लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून मागील वर्षी या अभियानांतर्गत १६० तलावांमधील गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, वेळेवर मशीन उपलब्ध न होणे, तसेच अंमलबजावणीस झालेला उशीर यामुळे केवळ ९८ तलावांमधील ११.८० लाख घनमीटर गाळ काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.------------जलयुक्तला हवीय गतीराज्यशासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. वर्ष २०१७-१८ मध्ये या अभियानांतर्गत १४९ गावांची निवड करण्यात आलेली आहे. जूनपर्यंत मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन असले, तरी विविध विभागांमध्ये असणारा असमन्वय, रखडलेली ई-निविदा प्रक्रिया, खोलीकरणाच्या कामांसाठी उपलब्ध न होण्याची मशीन यामुळे जलयुक्तची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हार प्रशासनासमोर आहे.------------गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानांतर्गत मागील वर्षी लोकसहभागातून चांगली कामे झाली. यंदाही पाणी कमी झाल्यानंतर १५० तलावांमधील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात येईल. काढलेला सुपीक गाळ शेतक-यांना मोफत देण्यात येणार आहे.- एस.डी. डोणगावकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जालना.