शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गाळमुक्त अभियानात भोकरदनला झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:34 IST

मृदा व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील दीडशे तलावांमधील गाळ काढण्यात येणार आहे.

जालना : मृदा व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील दीडशे तलावांमधील गाळ काढण्यात येणार आहे. यात भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक ४५, तर त्याखालोखाल जाफराबाद तालुक्यातील २२ तलावांचा समावेश आहे. तलावांमधील पाणी कमी झाल्यानंतर गाळ काढण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे.शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागांतर्गत मागील वर्षांपासून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. पाझर तलाव, लघु तलाव गाळमुक्त होऊन त्यातील पाणीसाठवण क्षमता वाढावी, तसेच धरणांमधील सुपीक गाळ शेतक-यांना शेतीसाठी उपयोगी पडावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गत वर्षी जाफराबाद तालुक्यातील शिंदी गावातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली होती. वर्ष २०१७-१८ साठी अभियानांतर्गत १५० गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक ४५, जाफराबादमधील २२ तर घनसावंगी तालुक्यातील सर्वात कमी नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या तलावांमध्ये पाणी आहे. उन्हाळ्यात पाणी आटण्यास सुरुवात झाल्यानंतर मार्च ते मे या तीन महिन्यात सुमारे १. ५० लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन जलसंधारण विभागाने केले आहे. लोकसहभाग मिळाल्यास यात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.----------मागील वर्षी ९८ तलावात कामलघु सिंचन जलसंधारण, लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून मागील वर्षी या अभियानांतर्गत १६० तलावांमधील गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, वेळेवर मशीन उपलब्ध न होणे, तसेच अंमलबजावणीस झालेला उशीर यामुळे केवळ ९८ तलावांमधील ११.८० लाख घनमीटर गाळ काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.------------जलयुक्तला हवीय गतीराज्यशासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. वर्ष २०१७-१८ मध्ये या अभियानांतर्गत १४९ गावांची निवड करण्यात आलेली आहे. जूनपर्यंत मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन असले, तरी विविध विभागांमध्ये असणारा असमन्वय, रखडलेली ई-निविदा प्रक्रिया, खोलीकरणाच्या कामांसाठी उपलब्ध न होण्याची मशीन यामुळे जलयुक्तची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हार प्रशासनासमोर आहे.------------गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानांतर्गत मागील वर्षी लोकसहभागातून चांगली कामे झाली. यंदाही पाणी कमी झाल्यानंतर १५० तलावांमधील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात येईल. काढलेला सुपीक गाळ शेतक-यांना मोफत देण्यात येणार आहे.- एस.डी. डोणगावकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जालना.