शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

केशर आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:02 IST

एरवी पौष महिन्यात आंब्याला मोहर फुटतो. मात्र, यावर्षी हे चित्र अपवादानेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे जाफराबाद तालुक्यातील केशर आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

टेंभुर्णी : एरवी पौष महिन्यात आंब्याला मोहर फुटतो. मात्र, यावर्षी हे चित्र अपवादानेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे जाफराबाद तालुक्यातील केशर आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी, नळविहिरा, गणेशपूर, देळेगव्हाण, पोखरी, निमखेडा, देऊळझरी या भागांत सुमारे १०० एकरावर केशर आंब्याची लागड झाली आहे. तर काही शेतक-यांनी गटशेतीच्या माध्यमातून आंबा लागवड केली आहे. केशर आंबा उत्पादनातून दरवर्षी शेतकरी चांगला नफा कमवतात. त्यामुळे शेतकरी आंब्याची वर्षभर विशेष काळजी घेतात. दरवर्षी पौष व माघात आंब्याला मोहर फुटतो. पौष महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीत बहुतांश आंब्यांच्या झाडांना मोहर येतो. परंतु या वर्षी तुरळक ठिकाणीच हे पाहावयास मिळत आहे. आता पौष संपून गुरुवारपासून माघ महिना लागला आहे. तरीही परिसरात कुठेच आंबे मोहरलेले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. वातावरणातील बदलांमुळे आंबे उशिरा व पाहिजे त्या प्रमाणात बहरत नसल्याने परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.-------------आमरायाही नामशेषटेंभूर्णी परिसरातील आमराया आता नामशेष झाल्या आहेत. काही शेतांमध्ये जुनी गावरान आंब्याची झाडे आमरायांची साक्ष देतात. यावर्षी मात्र गावरान आंब्यांसह, कलमी आंब्यांनाही अद्याप बहर न लागल्याने आमरसाची हौस विकतच्या आंब्यांवर भागावी लागणार आहे.---------------नोव्हेंबर ते जानेवारी हा आंबे मोहर फुटण्याचा काळ असतो. मात्र, यंदा अद्यापही आंब्यांना मोहर आलेला नाही. आंबे उशिरा मोहरले तरी गळ अधिक होते. त्यामुळे उत्पादन घटते. माझ्याकडे आंब्याची साडेतीन हजार झाडे आहेत. यातून यंदा पंधरा लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, यात यंदा निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.- संजय मोरे, केशर आंबा उत्पादक, नळविहिरा