शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

युरिया टंचाईने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:45 IST

पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर आता पेरणीसोबतच टाकण्यासाठीच्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अतिरिक्त युरियाचा साठा मागविला असल्याचे सांगण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर आता पेरणीसोबतच टाकण्यासाठीच्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अतिरिक्त युरियाचा साठा मागविला असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यापूर्वी कृषी विभागाने जवळपास ३९ हजार ११० मेट्रीक टन युरियाचा साठा मागविला होता. तो विविध विक्रेत्यांना वितरितही करण्यात आला होता. मात्र, जोपर्यंत दमदार पाऊस पडत नव्हता तोपर्यंत युरियासह अन्य मिश्र खतांना मागणी नव्हती. परंतु गेल्या आठ दिवसात भोकरदन आणि जाफराबाद तालुके वगळता अन्य सहा तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग वाढली आहे. जिल्ह्यात पाच लाख ८८ हजार खरिपाचे क्षेत्र आहे. पैकी निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी दिली. दरम्यान, बाजारात युरिया मुबलक प्रमाणात असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी केला असला तरी प्रत्यक्ष बाजारपेठेत फेरफटका मारला असता आरसीएफच्या युरियाची टंचाई असल्याचे दिसून आले.एकूणच जी मागणी शेतक-यांची आहे, त्याला अनुसरून आम्ही युरियाची आठ हजार मेट्रिक टन अधिकची मागणी नोंदविली आहे.येत्या एक दोन दिवसात हा युरीया रेल्वे रॅकव्दारे जालन्यात पोहचेल असे यावेळी कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी सांगितले. लवकरच साठा उपलब्ध होणार आहे.बाजारपेठेत शेतक-यांची गर्दीबाजारात सध्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी होत आहे. पाऊस पडल्याने शेतक-यांच्या चेहºयावर समाधान दिसून येत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी