शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

केंद्राने तयार केलेले शेतकरी कायदे भांडवलदारांच्या हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

वडीगोद्री : केंद्र सरकारने तयार केलेले शेतकरी कायदे हे भांडवलदार यांच्या हिताचे असल्याने हे शेतकरी कायदे रद्द होणे गरजेचे ...

वडीगोद्री : केंद्र सरकारने तयार केलेले शेतकरी कायदे हे भांडवलदार यांच्या हिताचे असल्याने हे शेतकरी कायदे रद्द होणे गरजेचे आहे. २० सप्टेंबर, २०२० हा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळा दिवस ठरला आहे. कारण या दिवशी अन्नदात्या शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारे तीन विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. ते शेतकरी कायदे केंद्र सरकारने रद्द केलेच पाहिजे, असे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या वतीने शेतकरी कायद्याच्या विरोधात शेतकरी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंतप्पा उबाळे, डॉ.सुरेश वाघमारे, उमर दाराज खान, मंचक डोने, अनिरुद्ध येचाळे, सुभाष लवटे, संतोष कोल्हे, बप्पासाहेब काळे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पाटील म्हणाले, या जाचक शेतकरी कायद्याबद्दल कोणीही जास्त बोलायला तयार नाही. कारण जर कोणी विरोध केला, तर त्याला ईडीची भीती दाखविली जात आहे. एका अर्थाने देशात हुकूमशाही निर्माण झाली आहे. राज्यातही जे पक्ष आतापर्यंत विरोधात लढले ते आता सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे राजकीय नैतिकता ही रसातळाला गेलेली दिसून येत आहे. फक्त सत्तेत राहण्याच्या हव्यासापोटी जनतेच्या भावनांशी राजकीय पक्ष खेळत आहेत. देशातील ही सर्व परिस्थिती लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहे. आम्ही कोणत्याही ईडीला घाबरत नाही. आमची काय चौकशी लावायची असेल ती लावावी, परंतु या केंद्र सरकारच्या जाचक शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत राहणार. आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा, शेतकरी किंमत हमी व कृषिसेवा करार कायदा, शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा ही सर्व कायदे अंबानी-आदानी व सहकारी यांच्या आर्थिक हितासाठी तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही हित समाविष्ट नाही. यावेळी अनिल गोएकर, विजय खूपसे, पंढरी जायनुरे, शशिकांत मतकर, शेखर बंगाळे, मारोती राठोड, यशवंत लवटे, अखिल देशमुख, चंद्रकांत हजारे, गणेश छेत्रे, राजेंद्र सुळ, ॲड.डी. आर. धैर्य, ॲड. माधव माडगे, विशाल कांबळे, दिग्विजय कांबळे, नाजम शेख, इस्माईल फुलारी आदी उपस्थित होते.