शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

भारनियमनामुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला होता. ...

यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला होता. जोरदार पावसामुळे जवळपास सर्वच धरणे, तलाव व विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांनी जोमाने रबी हंगामाच्या पिकांची लागवड केली आहे. सध्या पिके चांगलीच बहरलेली आहे. बहुतांश शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. परंतु, भारनियमनाने शेतकरी हैराण झाले आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांना जागी राहून पाणी द्यावे लागत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्याची दहशत आहे. बिबट्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर तसेच वन्यप्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. रात्रीचा वीजपुरवठा असल्यावर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.

अगोदरच खरिपातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने रबीच्या पिकातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. परंतु, महावितरणच्या भारनियमनाने शेतकरी हैराण झाले आहेत. महावितरणकडून रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येत असल्याने पिकांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

रामेश्वर राऊत, शेतकरी, सौंदलगाव

वीजपुरवठ्याचे नियोजन हे राज्यस्तरावरील आहे. संबंधित यंत्रणेच्या सूचनांचे पालन करूनच हे नियोजन केले जाते. त्यानुसार शेतकऱ्यांना वीजपुरवठा केला जातो.

एस.एस. हरकल, सहायक अभियंता