शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

शेतकऱ्यांसाठीच निवडणूक रिंगणात-कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:54 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ, भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ, भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.यावेळी बच्चू कडू यांना जालना लोकसभा मतदार संघातून निवडून येण्यासाठीचा कुठला अजेंडा आपल्याकडे आहे काय असे विचारले असता, ते म्हणाले की, आमचे नाते हे वेदनेशी आहे. शेतकरी आज दुष्काळाने हवालदिल झालेल्या बळीराजाला धीर देण्याासह त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपण दानवेंशी लढत देत असल्याचे कडू म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या परीक्षा संदर्भातील पोर्टलमध्ये मोठा गोंधळ असल्याचे सांगून मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही ही बाब भयंकर असल्याचे सांगितले. या पोर्टलमधून केवळ भाजपच्याच कार्यर्त्यांना नोकरी देण्यासाठीची ही उपाय योजना असल्याचे ते म्हणाले.आगामी निवडणुकीत काँग्रेसकडे पूर्वी एवढी ताकद राहली नसून, अन्य पक्षाचा तर विचार न केलेलाच बरा असे सांगून ते म्हणाले की, आपण सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडुन आलो आहोत. त्यामुळे आतही जनता आणि शेतकरी मला विजयी करतील यात शंका नसल्याचे ते म्हणाले. नागपूर येथून अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तुम्हाला येथे पाठविण्यात आले काय असे विचारले असता, त्यांच्या सल्लयानुसार मी पराभूत होईल असा टोला त्यांनी लगावला. भाजच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत असताना तुम्हांला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवे पुरस्कृत केल्यास तुम्ही त्यांचा पाठिंबा घेणार काय या प्रश्नाव त्यांनी नकार देऊन आमपण त्यांना पुरस्कृत करू असा टोला लगावला.भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात कधीच भारनियमन होत नाही, केवळ ज्या भागात शेतकरी राहतो त्याच भागाात हे भारनियमन का केले जाते, कारण तो बिचारा अन्याय सहन करण्यासाठी तयार असतो. ही बाब चुकीची असून, उर्जामंत्री बावनकुळे यांचा पुतळा हा मंत्रालयात उलटा लटकवून त्याचा निषेध करणार असल्याचेही आ. कडू यांनी सांगितले. दुष्काळच्या मुद्यावर सरकारने जे निकष लावले आहेत. ते सपशेल चुकीचे असल्याचे सांगून या मुद्यावर ३० आक्टोबरला आम्ही अकोला येथे मोठी दुष्काळ परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस साईनाथ चिन्नादोरे व अन्य पदाधिकाºयांची उपस्थिती होती. ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

टॅग्स :JalanaजालनाBachhu Kaduबच्चू कडूElectionनिवडणूक