शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

शेतकऱ्यांसाठीच निवडणूक रिंगणात-कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:54 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ, भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ, भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.यावेळी बच्चू कडू यांना जालना लोकसभा मतदार संघातून निवडून येण्यासाठीचा कुठला अजेंडा आपल्याकडे आहे काय असे विचारले असता, ते म्हणाले की, आमचे नाते हे वेदनेशी आहे. शेतकरी आज दुष्काळाने हवालदिल झालेल्या बळीराजाला धीर देण्याासह त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपण दानवेंशी लढत देत असल्याचे कडू म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या परीक्षा संदर्भातील पोर्टलमध्ये मोठा गोंधळ असल्याचे सांगून मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही ही बाब भयंकर असल्याचे सांगितले. या पोर्टलमधून केवळ भाजपच्याच कार्यर्त्यांना नोकरी देण्यासाठीची ही उपाय योजना असल्याचे ते म्हणाले.आगामी निवडणुकीत काँग्रेसकडे पूर्वी एवढी ताकद राहली नसून, अन्य पक्षाचा तर विचार न केलेलाच बरा असे सांगून ते म्हणाले की, आपण सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडुन आलो आहोत. त्यामुळे आतही जनता आणि शेतकरी मला विजयी करतील यात शंका नसल्याचे ते म्हणाले. नागपूर येथून अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तुम्हाला येथे पाठविण्यात आले काय असे विचारले असता, त्यांच्या सल्लयानुसार मी पराभूत होईल असा टोला त्यांनी लगावला. भाजच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत असताना तुम्हांला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवे पुरस्कृत केल्यास तुम्ही त्यांचा पाठिंबा घेणार काय या प्रश्नाव त्यांनी नकार देऊन आमपण त्यांना पुरस्कृत करू असा टोला लगावला.भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात कधीच भारनियमन होत नाही, केवळ ज्या भागात शेतकरी राहतो त्याच भागाात हे भारनियमन का केले जाते, कारण तो बिचारा अन्याय सहन करण्यासाठी तयार असतो. ही बाब चुकीची असून, उर्जामंत्री बावनकुळे यांचा पुतळा हा मंत्रालयात उलटा लटकवून त्याचा निषेध करणार असल्याचेही आ. कडू यांनी सांगितले. दुष्काळच्या मुद्यावर सरकारने जे निकष लावले आहेत. ते सपशेल चुकीचे असल्याचे सांगून या मुद्यावर ३० आक्टोबरला आम्ही अकोला येथे मोठी दुष्काळ परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस साईनाथ चिन्नादोरे व अन्य पदाधिकाºयांची उपस्थिती होती. ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

टॅग्स :JalanaजालनाBachhu Kaduबच्चू कडूElectionनिवडणूक