शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठ्याची स्वप्नपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:22 IST

जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे. जिल्ह्यात कृषीपंप कार्यान्वित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने शेतक-यांतून नेहमीच ओरड होत होती. यामुळे शेतक-यांना रात्र जागून काढून पिकांना पाणी द्यावे लागते होते. यामुळे शेतक-यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे राज्यातील शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून तसेच महावितरणचे संचालक संजीव कुमार यांच्या पुढाकाराने शेतक-यासाठी सदर योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभर भरघोस प्रतिसादही मिळत आहे. जालना जिल्ह्यातून आतापर्यत २७ हजार शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ९ हजार आठ शेतक-यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार २३२ शेतक-यांनी शुल्काचा भरणाही केलेला आहे. २ हजार शेतक-यांची यादी संबंधित कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. १ हजार शेतक-यांचा स्थळ पाहणी अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ७२ शेतकºयाकडे सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांसाठी ८ हजार २८० रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २४ हजार ७१० तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांसाठी १२ हजार ३५५ रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय पारंपरित वीजपुरवठ्यासाठी रक्कमेचा भरणा करुन प्रलंबीत यादीत असलेल्या संबंधित लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येणार असून त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. प्रथम पैसे भरणा-यांना प्राधान्य या तत्वावर शेतकºयांना सौर कृषीपंप बसवून देण्यात येत आहे. शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.दिवसेदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दगडी कोसळा जाळून वीज निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होत आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उन्ह तापते सौरपंपामुळे शेतक-यांना दर्जेदार वीज उपलब्ध होण्यास मदत होईल. शेतकºयांना दिवसाही शेतीपंपास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलापासून मुक्तता सोबतच डिझेलच्या तुलनेत शून्य खर्च असणार आहे.

टॅग्स :electricityवीजgovernment schemeसरकारी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र