शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठ्याची स्वप्नपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:22 IST

जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे. जिल्ह्यात कृषीपंप कार्यान्वित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने शेतक-यांतून नेहमीच ओरड होत होती. यामुळे शेतक-यांना रात्र जागून काढून पिकांना पाणी द्यावे लागते होते. यामुळे शेतक-यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे राज्यातील शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून तसेच महावितरणचे संचालक संजीव कुमार यांच्या पुढाकाराने शेतक-यासाठी सदर योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभर भरघोस प्रतिसादही मिळत आहे. जालना जिल्ह्यातून आतापर्यत २७ हजार शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ९ हजार आठ शेतक-यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार २३२ शेतक-यांनी शुल्काचा भरणाही केलेला आहे. २ हजार शेतक-यांची यादी संबंधित कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. १ हजार शेतक-यांचा स्थळ पाहणी अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ७२ शेतकºयाकडे सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांसाठी ८ हजार २८० रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २४ हजार ७१० तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांसाठी १२ हजार ३५५ रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय पारंपरित वीजपुरवठ्यासाठी रक्कमेचा भरणा करुन प्रलंबीत यादीत असलेल्या संबंधित लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येणार असून त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. प्रथम पैसे भरणा-यांना प्राधान्य या तत्वावर शेतकºयांना सौर कृषीपंप बसवून देण्यात येत आहे. शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.दिवसेदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दगडी कोसळा जाळून वीज निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होत आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उन्ह तापते सौरपंपामुळे शेतक-यांना दर्जेदार वीज उपलब्ध होण्यास मदत होईल. शेतकºयांना दिवसाही शेतीपंपास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलापासून मुक्तता सोबतच डिझेलच्या तुलनेत शून्य खर्च असणार आहे.

टॅग्स :electricityवीजgovernment schemeसरकारी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र