शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक -कैलास गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:58 IST

येत्या निवडणुकीत या सरकारला नागरिकांनी खाली खेचावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकरी, कामगार तसेच अन्य क्षेत्रातील नागरिकांची केवळ दिशाभूल केली आहे. अच्छे दिन च्या नावाखाली आज मंदीचे सावट सर्वत्र दाट झाले आहे. यामुळे सामान्य माणूस हैराण आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला नागरिकांनी खाली खेचावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.त्यांनी जालना विधासभेतील विविध गावांना भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने बाजीउम्रद, सोमनाथ जळगाव, बाजीउम्रद तांडा, मोतीगव्हाणसह अन्य गावांना गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. अनेकांनी पीकविमा, कर्जमाफी ही फसवी कशी आहे, याची अनेक उदाहरणे दिली. तसेच पीकविम्याच्या नावाखाली सरकारने विमा कंपन्यांचीच तिजोरी भरली आहे. यात शिवसेना सत्तेत राहून मोर्चा काढण्याची वेळ थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवरच आली आहे, यावरूनच विमा कंपन्यांनी सरकारलाच कसे फसवले हे लक्षात येते.आजही अनेकांना पीककर्ज मिळालेले नाही. बँकाकडून अडवणूक सुरू आहे. मध्यवर्ती बँकेचे आपण उपाध्यक्ष असल्याने तेथे जातीने लक्ष घालून कर्ज वाटपाचा टक्का यंदा वाढवल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला.एकूणच या राज्यात केवळ राजकीय नौटंकी सुरू आहे. अनेकांना पक्षात घेऊन निवडणुका जिंंकता येतात हा समज जनता यापुढे सहन करणार नसल्याचा विश्वास आपल्याला असल्याचे प्रतिपादनही गोरंट्याल यांनी केले.यावेळी त्यांनी विविध शेतक-यांच्या घरी जाऊन समस्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गणेश चौधरी, गणेश खरात, संजय शेजूळ, सोपान तिरुखे, अंजेभाऊ चव्हाण, युवराज चव्हाण, दत्ता पा. शिंदे, नारायण वाढेकर, राजेंद्र शिंदे, मल्हारी पठाडे, समाधान शेजूळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक