शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

सावकाराने बळकावली शेतकऱ्यांची शेतजमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

जालना : व्याजाने पैसे देऊन शेतकऱ्याची जमीन बळकावल्याची घटना बदनापूर तालुक्यातील आन्वी येथे घडली. या प्रकरणी लिंबा वाच्छू जाधव ...

जालना : व्याजाने पैसे देऊन शेतकऱ्याची जमीन बळकावल्याची घटना बदनापूर तालुक्यातील आन्वी येथे घडली. या प्रकरणी लिंबा वाच्छू जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जनार्दन कोंडीबा म्हस्के (रा. आन्वी) याच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

परिस्थिती नाजूक असल्याने फिर्यादीचे वडील वाच्छू जाधव यांनी गावातील सावकार जनार्दन म्हस्के यांच्याकडून १९ ऑक्टोबर २०११ रोजी एक लाख रुपये ५ रुपये शेकड्याने घेतले होते. त्या मोबदल्यात त्यांनी ६० आर जमिनीचे खरेदीखत करून दिले होते. त्यावेळी पैसे दिल्यानंतर जमीन परत दिली जाईल, असे आश्वासन म्हस्के यांनी दिले. काही दिवसांनी वाच्छू जाधव यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली. त्यानंतर फिर्यादीने जनार्दन म्हस्के यांना साक्षीदार शेषराव राठोड (रा. कंडारी तांडा) व फिर्यादीची पत्नी कमलबाई लिंबा जाधव यांच्यासमक्ष घेतलेले एक लाख रुपये व पाच रुपये शेकड्याने झालेले व्याज असे एकूण ३ लाख २१ हजार ९९० रुपये दिले. त्यानंतर फिर्यादीने सावकाराकडे जमिनीची मागणी केली. परंतु, म्हस्के याने जमीन देण्यास टाळाटाळ केली. याबाबत जिल्हा निबंधक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली. जिल्हा निबंधकांनी दुय्यम निबंधक, बदनापूर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी शनिवारी रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात जनार्दन म्हस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.