शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक शेती हाच शेतकरी आत्महत्यांवरील रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:49 IST

शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे आर्थिक हतबलता हे कारण आहे, परंतु यावर उपाय असून, तो थोडा संयमी उपाय म्हणजेच नैसर्गिक शेती हाच असल्याचा दावा झिरो बजेट शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे आर्थिक हतबलता हे कारण आहे, परंतु यावर उपाय असून, तो थोडा संयमी उपाय म्हणजेच नैसर्गिक शेती हाच असल्याचा दावा झिरो बजेट शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केला. ते रविवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी जालना तालुक्यातील सामनगाव येथे शिवारफेरी करून, मोसंबी बागांची पाहणी केली.या वेळी पत्रकारांशी बोलताना पाळेकर म्हणाले की, स्वामी नाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्या देणे सरकारला परवडत नाही, त्यातच ज्यावेळी शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येतो, त्यावेळी आयात-निर्यातीचे धोरण बदलते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील भाव गडगडतात आणि शेतकऱ्यांच्या श्रमाला कवडीमोल किंमत मिळते. तसेच रासायनिक आणि सेंद्रिय शेती करताना जो खर्च येतो, तो न परवडणारा असतो, आणि त्यातूनच मग शेतकºयांवर बँकांचे कर्ज वाढते. ते न फेडता आल्याने शेतकरी हतबल होऊन जीवन संपवतो. त्यामुळे सरकारने कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करावी, परंतु, ही कर्जमुक्ती सरकारच्या भरवशावर शक्य होणार नसून, त्यासाठी नैसर्गिक शेती हाच एक सक्षम पर्याय असल्याचे ते म्हणाले. पाळेकर यांनी सारवाडी येथील बनवारी यांच्या शेतीलाही भेट देऊन पाहणी केल्याचे सांगितले.नैसर्गिक शेतीत अत्यल्प खर्च येत असून, ती पर्यावरणपूरक आहे. भारतात जवळपास सात लाख शेतकरी हे आता नैसर्गिक शेतीकडे वळल्याची माहिती पाळेकर यांनी दिली. या शेतीला पाणी आणि वीजही कमी लागत असून, रासायनिक निविष्ठांचा येथे प्रश्नच येत नाही, या शेतीतून जे उत्पादन निघते, ते देखील कसदार असते. या शेती उत्पादनला आजच्या बाजारपेठेत चक्क दीडपट भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी या शेतीकडे वळल्याचे ते म्हणाले. त्यांनी रविवारी सामनगाव येथील पूर्णत: नैसर्गिक शेतीच्या निकषनुसार मोसंबीची बाग दुष्काळातही मोठ्या हिंमतीने जगवल्याचे त्यांनी कौतुक केले. या शिवारफेरीत त्यांच्या सोबत जवळपास ४०० शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी दीपक बनवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmer suicideशेतकरी आत्महत्या