शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शेततळ्यांचे फोटो अपलोडिंग अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:44 IST

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात शेततळ्यांचे ९४.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कृषी व महसूल विभागाच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे सुमारे अडीच हजार शेततळ्यांचे फोटो अपलोडिंगचे काम अपूर्ण असल्याने शेतक-यांना अद्याप शेततळ्याचे अनुदान मिळालेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात शेततळ्यांचे ९४.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कृषी व महसूल विभागाच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे सुमारे अडीच हजार शेततळ्यांचे फोटो अपलोडिंगचे काम अपूर्ण असल्याने शेतक-यांना अद्याप शेततळ्याचे अनुदान मिळालेले नाही.मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षाकरिता सहा हजार शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट होते. पैकी पाच हजार ८०० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. जालना तालुक्यात १२३२ पैकी १०१० तर भोकरदन तालुक्यात १२६२ पैकी १२६० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. आठही तालुके मिळवून जिल्ह्यात ५००८ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, पूर्ण कामांची टक्केवारी ८३.४७ इतकी आहे. आतापर्यंत चार हजार ८१३ शेततळ्यांच्या खोदकामासाठी लाभार्थी शेतक-यांना सुमारे २३ कोटी ७९ लाखांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळविण्यासाठी कृषी सेवक, कृषी साहाय्यकांना अ‍ॅपद्वारे शेततळ्याचे फोटो काढून शेतक-याच्या लॉगिन आयडीवर आॅनलाइन अपलोड करणे आवश्यक असते. मात्र, ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करणा-या महसूल व कृषी विभागाच्या अधिका-यांकडून शेतक-यांची अडवणूक केली जात आहे. एका शेततळ्याचे फोटो अपलोड करण्यासाठी आठवडाभराहून अधिक वेळ लावला जात आहे. त्यातच सुट्टी, रजा, इंटरनेट बंद आहे, तुमच्या कामाला वेळ लागेल,अशी वेगवेगळी कारणे सांगून वेळकाढूपणा करण्याचे प्रकार कृषी सहायक व कृषी सेवकांकडून केले जात असल्याच्या तक्रारी शेतक-यांमधून केल्या जात आहे.जिल्ह्यात पूर्ण झालेल्या पाच हजार ८ शेततळ्यांपैकी दोन हजार ६१७ शेततळ्यांच्या फोटो अपलोडिंगचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप दोन हजार ३९१ शेतळ्यांचे फोटो अपलोडिंग अपूर्ण आहे. हे काम अपूर्ण असल्यामुळे बहुतांश शेतक-यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही.कामे करतात दुसरेचग्रामीण भागात अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, कृषीसेवक हे अनेक दिवस गावात येत नाही. अनेकजण आपली कामे पूर्ण करण्यासाठी गावातीलच एखाद्या व्यक्तीला हाताशी धरतात. अनेक महत्त्वाची शासकीय दस्तावेज अशा व्यक्तींकडे सोपविल्या जातात. मात्र, या प्रकारामुळे शेतक-यांची अडणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. शेतक-यांना कामासाठी वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जात आहे.