शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांची गुंफण करण्यासाठी कौटुंबिक न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:36 IST

नाजूक नात्यांची गुंफण करण्यासाठीच कौटुंबिक न्यायालय असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संयुक्त कुटुंबातील सदस्यांनी उपजीविकेसाठी स्थलांतर केल्यानंतर विभक्त कुटुंबामध्ये विसंवाद निर्माण झाल्याने वाढलेल्या अडचणी व समस्या, त्यातून निर्माण झालेल्या कौटुंबिक कलहाची सोडवणूक आणि वैवाहिक जीवन, मुलांचे संगोपन व निकोप वाढीसाठी त्यांनी एकत्रित येऊन नाजूक नात्यांची गुंफण करण्यासाठीच कौटुंबिक न्यायालय असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे, पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, जालना कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश अभिनंदन पाटंगणकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण उढाण आदींची उपस्थिती होती.रविवारी सकाळी येथे कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे पुढे ते म्हणाले की, वैवाहिक जीवनानंतर कुटुंबातील सदस्यांमधील कटूतेचा परिणाम लहान मुलांच्या मानसिकतेवर व व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडण, संगोपनावर आणि संवेदनशील मनावर होत असतो. या सर्वांमधून मार्ग काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या समुदेशकाने त्यांना एकत्र आणून त्यांचे मनोमिलन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.जर दोघे एकत्र येण्याची कधीच शक्यता नसेल अशी जाणीव झाल्यास त्यांच्यामध्ये जास्त अवधी न घालता पुढील भविष्याची वाटचाल तात्काळ करता यावी म्हणून त्यांना विभक्त होण्याचा मार्ग सुकर करावा. जेणेकरून त्यांच्या आयुष्याचा वेळ वाया न जाता पुढील भविष्याची वाटचाल चांगल्या पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.यावेळी न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी सांगितले की, कौटुंबिक न्यायालयाची संकल्पना १९४० मध्ये अस्तित्वात येऊन तिला १९८४ मध्ये कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.

टॅग्स :Courtन्यायालयFamilyपरिवार