शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

अनलॉकच्या निर्णयाने व्यापारी, ग्राहकांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

दरम्यान, कोरोनाची आकडेवारी आणि मृत्यू घटल्यानेच हे शक्य झाल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे आता व्यवहार सुरू करताना खूप मोठी काळजी ...

दरम्यान, कोरोनाची आकडेवारी आणि मृत्यू घटल्यानेच हे शक्य झाल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे आता व्यवहार सुरू करताना खूप मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी काही उपाय आवश्यक असल्याचे दिसून आले.

------------

मोठा दिलासा मिळाला

आज अनलॉकबाबत राज्य सरकारने जे नियम जाहीर केले आहेत, ते नक्कीच दिलासादायक आहेत. यासाठी आम्ही व्यापारी महासंघाच्या माध्यमातून आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे ही मागणी केली. प्रत्येकाने आपल्याला चांगली साथ दिल्यानेच हे शक्य झाले आहे.

- विनीत साहनी, अध्यक्ष, व्यापारी महासंघ जालना

--------------------------

जबाबदारी वाढली

कोरोनाने शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाले होते. ऐन लग्नसराई तसेच अन्य सभा, समारंभांवर बंधने होती. त्यामुळे बाजारपेठेतील उत्साहच हरवला होता. आता हा नवीन निर्णय शुक्रवारपासून लागू होणार असल्याने व्यापारी आणि ग्राहक खूश आहेत. परंतु आता बाजारात मास्कशिवाय विक्री न करणे, सुरक्षित अंतराचे नियम जास्तीतजास्त कसोशीने पाळणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.

- सतीश पंच, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, जालना

--------------------------------

सम-विषमचा पर्याय ठेवावा

राज्य सरकारने अनलॉक करून सर्व व्यवहार सुरू केले आहेत. त्यामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था गतिमान होईल. हे जरी खरे असले तरी, जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून काही दुकाने सम आणि काही दुकाने विषम तारखांना उघडल्यास गर्दी कमी होईल. त्यासाठी दुकानांची वर्गवारी पाडावी लागेल.

- पुरुषोत्तम जयपुरीया, सामाजिक कार्यकर्ते, जालना