शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला तरी आम्हांला काहीच कसे वाटत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

चार वर्षांपूर्वीपर्यंत सरकार महिन्याभराच्या अंतराने दरवाढ करीत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन तेल कंपन्यांना ...

चार वर्षांपूर्वीपर्यंत सरकार महिन्याभराच्या अंतराने दरवाढ करीत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन तेल कंपन्यांना होणारा तोटा लक्षात घेऊन वाढ केली जात होती. सरकारकडून एकाच दिवशी जवळपास प्रती लिटर पेट्रोलमागे २ ते ५ रुपये वाढविले जात होते. सरकारकडून दरवाढीचा निर्णय होताच नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. सरकारलाही या आंदोलानाची दखल घ्यावी लागत होती. आता मात्र, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. असे असतानाही राजकीय पक्ष व ग्राहकांकडून आंदोलने केली जात नाहीत. त्यामुळे सरकारही आपल्या परीने पेट्रोल व डिझेलचे दर वाढवित आहे.

जालना जिल्ह्यात जानेवारी, २०१७ मध्ये पेट्रोलचा भाव ६१ व डिझेलचा भाव ५९ प्रती लिटर होता. २१ जानेवारी, २०२१ रोजी पेट्रोलचा भाव ९३ रुपये तर डिझेलचा भाव ८२ रुपये प्रती लिटर आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे असतानाही ग्राहक शांत बसलेले आहे.

चौकट

जालना शहरात दरदिवशी ११ ते १२ हजार लिटर डिझेल व पेट्रोलची विक्री होते. रिलायन्स, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या चार कंपन्यांमार्फत पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होतो. प्रत्येक दिवशी दरात बदल करण्याचा निर्णय घेतल्यापासून शहरातील सर्वच पेट्रोल पंपांचा कारभार ऑनलाईन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पेट्रोल व डिझेल अत्यावश्यक वस्तूंमध्ये मोडणारी वस्तू आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर पडत आहे. महागाई वाढण्यामागे पेट्रोल व डिझेलची भाववाढ कारणीभूत आहे. विद्यमान केंद्र शासनाला सामान्य जनतेबाबत सहानुभूती असती, तर डिझेलवर काही प्रमाणात सबसिडी दिली असती, परंतु केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर आकारून यातून नफा कमविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाविरोधात आंदोलन केले जाईल.

संतोष राजगुरू, प्रहार संघटना